Tuesday, July 24, 2018

भारताचा इतिहास

  भारताचा इतिहास 


प्राचीन, मध्ययुगीन व मराठ्यांचा इतिहास 


सिंधू संस्कृती :

  • सिंधू संस्कृती हि सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. 
  • हडप्पा संस्कृतीचा शोध दयाराम सहानी यांनी १९२१ मध्ये रेल्वेमार्गाचे काम चालू असताना लावला . 
  • मोहंजोदाडो येथील सिंधू संस्कृतीचा शोध राखलदास बॅनर्जी यांनी १९२२ मध्ये लावला. 
  • सिंधू संस्कृती मातृसत्ताक होती. 
  • हडप्पा संस्कृतीतील लोक चांदी व तांबे यांची भांडी वापरात होते. 
  • रावी व सिंधू   नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृती पसरलेली होती. या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. 
  • हडप्पा संस्कृतीला लोक मृतदेह पुरात. 

                                                                                                                                                                    वैदिक संस्कृती:   

  • पंजाबच्या सुपीक प्रदेशात व भारताच्या वायव्य भागात वैदिक संस्कृतीचा विकास झाला. 
  • वैदिक कालखंड ई. पु. १५०० ते इ. पू  ६०० इतका आहे. 
  • ऋग्वेद हा वैदिक संस्कृतीचा पहिला ग्रंथ होय. 
  • ऋग्वेदानंतर क्रमाने यजुर्वेद, सामवेद  व अथर्ववेद हे ग्रंथ रचले. 
  • या काळात वस्तुविनिमय पद्धत अस्तित्वात होती. 
  • लोकांचा मुख्य व्यवसाय शेती होता. 
  • आर्यांची संपत्ती हि गायीच्या संख्येत  मोजली जात होती. 
  • वैदिक काळात गावातील प्रमुखास ग्रामिणी म्हणत. 
  • गार्गी , मैत्रेयी ,लोपामुद्रा यासारख्या विद्वान स्रिया या काळात होऊन गेल्या. 

             

जैन धर्म :

  •  जैन धर्माची स्थापना हि भगवान ऋषभदेव यांनी केली . 
  • वर्धमान महावीर हे जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर होते . 
  • महावीरांनी आपला संदेश सामान्य लोकांना समजण्यासाठी 'अर्धमागधी  या लोक भाषेचा  या वापर केला . 
  • महावीरांची पंचमहाव्रते खालीलप्रमाणे -   १) अहिंसा     २) अस्तेय        ३) सत्य        ४) अपरिग्रह    ५) ब्रम्हचर्य                                                                         
  • सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान , सम्यक चारित्र्य ही तीन तत्वे महावीरांनी सांगितली .                                                          

बौद्ध धर्म :      

  • गौतम बौद्धांचा जन्म हा नेपाळमधील लुंबिनी या ठिकाणी झाला . 
  • त्यांचे मूळ नाव सिद्धार्थ असे होते. 
  • गौतम बौद्धांनी पहिला उपदेश  सारनाथ येथे दिला. 
  • बौद्ध धर्माची चार आर्य सत्य : १) जीवन हे दुख्खमय आहे. २) तृष्णेचा त्याग करावा . ३) दुःखाला तृष्णा हे मूळ कारण आहे. ४) तृष्णेचा त्याग करण्यासाठी अष्टांग मार्ग स्वीकारला पाहिजे . 
  • पंचशील तत्वे : १) अहिंसा २) सत्य ३) अस्तेय ४) अपरिग्रह ५) ब्रह्मचारी 
  • गौतम बौद्धांनी आपला उपदेश अर्धमागधी या लोकभाषेत दिला. 

१६ महाजनपदे :     

   इ. पू . ६ व्या शतकात  भारतात १६ महाजनपदाचा उदय झाला.   १६ महाजनपदे खालीलप्रमाणे: 

  1. काशी  ( बनारस 
  2. कोसल ( लखनौ )
  3. मल्ल    (गोरखपूर)
  4. वत्स     (अलाहाबाद )
  5. चेदी     (कानपुर) 
  6. कुरु     ( दिल्ली)
  7. पांचाळ  (रोहीलखंड)
  8. मत्स्य     जयपूर)
  9. शूरसेन   (मथुरा)
  10. अस्मक   (औरंगाबाद)
  11. अवंती    (उज्जेन )
  12. अंग        (चंपा)
  13. मगध     (दक्षिण बिहार ) 
  14. वृज्जी     ( उत्तर बिहार 
  15. कंबोज    ( गांधारजवळ)
  16. गांधार     (पेशावर)

मध्ययुगीन भारतातील  साम्राज्य :

                राज्य                    राजधानी 
  1. पल्लव                        कांची 
  1. सातवाहन                   प्रतिष्टान 
  1. वत्स                            कोसंबी 
  1. अवंती                         उज्जयिनी
  1. मौर्य                          पाटलीपुत्र 
  1. चालुक्य                      बदामी 
  1. मगध                           राजगृह 
  1. कोसल                        साकेत 


१)  दिल्लीची सुलतानशाही  - 

  • भारतातील पहिला मुस्लिम राज्यकर्ता कुतुबुद्दीन ऐबक होय. 
  • अल्तमश हा खऱ्या अर्थाने दिल्लीचा पहिला सुलतान ओळखला जातो. 
  • अल्तमश याने टंका हे चांदीचे नाणे पडले. 
  • रझिया सुलतान दिल्लीच्या तख्तावर बसणारी पहिली महिला  सुलतान होय. 
  • अल्लाउद्दीन खिलजी १२९६ मध्ये दिल्लीचा सुलतान बनला. 
  • मुहंमद तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून   देवगिरीला नेली . 
  • नासिरुद्दीन महमूद हा तुघलक घराण्याचा शेवटचा सुलतान होय. 
  • तुघलकानंतर सय्यद घराण्याची सत्ता  दिल्लीवर राहिली, त्यानंतर लोधी घराण्याची सत्ता दिल्लीवर आली .  हा दिल्लीचा शेवटचा सुलतान होता. 
  • इ . स . १५२६ मध्ये बाबराने इब्राहिम लोदीचा पानिपत येथे पराभव केला . त्याचबरोबर सुल्तानशाहीचा शेवट झाला व मुघल सत्ता  उदयास आली. 

२) मुघल साम्राज्य - 

  • मुघल साम्राज्याचा संस्थापक हा बाबर होता. 
  • बाबरानंतर त्याचा मुलगा हुमायून  गादीवर आला . 
  • अकबर व हेमू यांमध्ये पानिपतचे दुसरे युद्ध १५५६ रोजी झाले,यात अकबर विजयी झाला . 
  • अकबराचे धार्मिक धोरण उदार होते .त्याने हिंदूंवर लादलेला झिझिया कर रद्द केला. 
  • दिन ए इलाही नावाचा नवीन पंथ  निर्माण केला. 
  • मेवाडचा राजा राणा प्रताप यांनी अकबराबरोबर केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे . 
  •  शहाजहानने सुप्रसिद्ध असा ताजमहाल बांधला . 
  • १६५८ मध्ये औरंगजेब भारताचा बादशाह झाला . 
  • औरंगजेबाने मुघल सत्तेचा विस्तार केला . 
  • औरंगजेब हा त्याच्या असहिष्णू धोरणासाठी प्रसिद्ध होता. 
  • महाराष्ट्रातील मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष करून आपले स्वतंत्र राखले .मराठ्याविरुद्ध औरंगजेबाने २५ वर्ष युद्ध पुकारले परंतु मराठे त्याला पुरून उरले
  • औरंगजेबाचा मृत्यू १७०७ मध्ये झाला   व त्याचबरोबर मुघल सत्तेच्या अस्ताला सुरुवात झाली . 
  • मुघल काळात तंबाखू , बटाटा,हि पिके नव्याने घेण्यास सुरुवात   झाली .    

3) मराठा  साम्राज्य :  

  • स्वराज्यस्थापना :  
                               छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर मधील शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६०३० रोजी झाला . 
  • शहाजीराजांनी पुण्याच्या जहागिरीचा भाग वीरमाता जिजाबाई  व शिवाजी महाराज यांच्यालकडे सोपवला . 
  • शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागात सुरुवात केली. 
  • या स्वराज्य स्थापनेत बाजी पासलकर , जीवा  महाला , कान्होजी जेधे, तानाजी मालुसुरे, बाजीप्रभू देशपांडे , नेताजी पालकर, यांसारख्या मावळ मुलखातील सवंनगड्यानी साथ दिली. 
  • शिवाजी राजांना  धडे हे आऊसाहेबांनी दिले .
  • शिवाजी महाराजांनी मिळवलेला पहिला विजय तोरणा हा किल्ला . 
  • महाराजांनी सामान्य जनतेला एकत्र करून आपल्या  स्वराज्याची स्थापना केली. 
  • इ . स . १६५६ मध्ये शिवरायांनी जावळीवर स्वारी करून जावळीचा प्रदेश स्वराज्यात सामील केला. 
  •   १० नोव्हेम्बर १६५६ रोजी शिवरायांनी अफझल खानाचा वध केला.  
  • सिध्धी जोहरच्या  वेढ्यातून महाराजांची सुटका करताना बाजीप्रभू देशपांडे यांनी आत्मबलिदान केले व शिवरायांचे प्राण वाचवले . 
  • ६ एप्रिल १६६३ रोजी शिवरायांनी लाल महालावर छापा घालून शाहिस्तेखानाची बोटे तोडली. 
  • सुरतेची पहिली लूट १६६४ रोजी केली. 
  • जून १६६५ मध्ये जयसिंग व महाराजांमध्ये पुरंदरचा तह झाला . या तहात मुघलांना तेवीस किल्ले व भोवतालचा चार लाख उत्पादनाचा प्रदेश दिला. 
  • शिवरायांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगडावर झाला. 
  • शिवरायांची राजमुद्रा : "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता  । शाहसूनो: शिवस्येषा मुद्रा भद्राय राजते ।।
  • स्वराज्याचे अष्टमंडळ :
  1. मोरो त्र्यंबक पिंगळे -- मुख्य प्रधान 
  2. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार -- अमात्य 
  3. अण्णाजी दत्तो -- सचिव 
  4. दत्ताजी त्र्यंबक वाकनीस -- मंत्री 
  5. हंबीरराव मोहिते -- सेनापती 
  6. रामचंद्र त्र्यंबक डबीर -- सुमंत 
  7. निराजी रावजी -- न्यायाधीश 
  8. मोरेश्वर पंडितराव -- पंडितराव          
  •  शिवाजी महाराजांच्या राज्यात १४० किल्ले व १३  सागरी किल्ले होते. 
  • छत्रपती शिवरायांचे निधन ३ एप्रिल १६८० मध्ये रायगडावर झाले                                                                                                                                                                                                              संभाजी महाराज :  
  • शिवरायांच्या निधनानंतर संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले . 
  • संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभुषण हा राजनीतिपर ग्रंथ लिहिला . 
  • अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बसंभाजी राजांनी औरंगजेबाशी झुंझ दिली 
  • ११ मार्च १६८९ रोजी अत्यंत अमानुषपणाने छत्रपती संभाजी राजांची हत्या औरंगजेबाने केली. 
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                    
  • संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज छत्रपती झाले. 
  • १६८९ मध्ये मुघलांनी रायगड ताब्यात घेऊन महाराणी येसूबाई व शाहू महाराजांना कैद केले. 
  • राजाराम महाराजांचा मृत्यू अल्पशा आजाराने १७०० मध्ये सिंहगडावर निधन झाले. 
  • यानंतर महाराणी ताराबाई यांनी सरदारांच्या साहाय्याने मराठा साम्राज्याचे संरक्षण केले. 
  • शाहू महाराजांचा राज्याभिषेक १७०७ मध्ये सातारा येथे झाला. 

  • पेशवाई 
  • १७१३ मध्ये पेशवे म्हणून बाळाजी विश्वनाथ यांचिं नेमणूक केली. 
  • बालाजी विश्वनाथ -- ( १७१३ ते १७२० ) 
  • पहिला बाजीराव -- ( १७२० ते १७४० )
  • बाळाजी बाजीराव -- ( १७४० ते १७६१ ) 
  • पहिला माधवराव पेशवा -- ( १७६१ ते १७७२ ) 
  • नारायण पेशवे -- ( १७७२ ते १७७३ ) 
  • दुसरा बाजीराव -- ( १७९६  ते १८१८)
  • मल्हार राव होळकर हे इंदोरच्या सत्तेचे संस्थापक होते. 
  • नागपूरच्या भोसल्यामध्ये राघोजी भोसले हे सर्वात कर्तबगार पुरुष होते . 
  • महादजी शिंदे यांना मराठ्यांच्या उत्तरेकडील साम्राज्यात विशेष योगदान राहिले. 
  • १८१८ मध्ये संपूर्ण मराठा सत्ता संपुष्ठात आली .    

आधुनिक भारताचा इतिहास :  

        
  • भारतात परकीयांचे आगमन :
  •  भारतात सर्वप्रथम पोर्तुगीज १४९८ मध्ये आले . 
  • डच --१६०२ मध्ये डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली . 
  • इंग्रज -- १५९९ मध्ये इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. इंग्रजांनी पहिली वखार सुरत येथे मुघल बादशाह जहांगीर याच्या परवानगीने स्थापन केली . 
  • फ्रेंच -- १६६४ मध्ये फ़्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 


१८५७ चा उठाव :

१८५७ पूर्वीचे उठाव ---
  1.  संन्याशांचा उठाव 
  2. मुंडा उठाव 
  3. छोटा नागपूर पठारावरील कोलामांचा उठाव 
  4. बिहारमधील संथाळांचा उठाव 
  5. गोंडाचा उठाव 
  6. कोल्हापूरातील गडकऱ्यांच्या उठाव 
  7. महाराष्ट्रात कोळी,  भिल्ल,रामोशी यांनी केलेले उठाव 
  8. पाळेगारांचा उठाव       
१८५७ च्या उठावाची कारणे : 
  • अनेक संस्थाने खालसा केली . 
  • नव्या महसूल पद्धती 
  • जुन्या परंपरा व चालीरीती यांत हस्तक्षेप केला . 
  • सामाजिक जीवनातील हस्तक्षेप 
  • आर्थिक धोरण 
  • ख्रिस्ती धर्माचा  प्रसार 
  • सैन्यातील भेदभाव 
  • काडतूस प्रकरण   
उठावाची सुरुवात :    
  •  मंगल पांडे यांनी मेजर ह्युसनवर गोळी २९ मार्च १८५७ रोजी झाडली उठावाची सुरुवात झाली. 
  • मंगल पांड्येना ८ एप्रिल १८५७ रोजी फाशी झाली . 
  • १८५७ चा उठाव हा लॉर्ड कॅनिंगच्या काळात घडला . 
  • घोषणा-- चालो दिल्ली 
  • संदेश वाक्य -- " सबकुछ लाल होगा " 
  • उठावाचे प्रमुख केंद्र -- दिल्ली 
  • १० मे १८५७ रोजी मीरत येथे उठावास सुरुवात झाली. 
  • उठावाची केंद्रे -- दिल्ली ,  कानपुर,लखनौ , झाशी , अलाहाबाद, जगदीशपूर
  •  नेतृत्व : 
  • बिहार -- कुवरसिंह 
  • झाशी -- राणी लक्ष्मीबाई 
  • दिल्ली -- बहादूर शहा जफर 
  • कानपुर -- नानासाहेब पेशवे व तात्या टोपे 
  • लखनौ -- बेगम हजरत महल 
  • अलाहाबाद -- लियाकत अली 

अपयशाची कारणे : 
  • एककेंद्री नेतृत्व नाही. 
  • उठावास एकसूत्रता नव्हती . 
  • संस्थानिक व सुशिक्षित उठावापासून अलिप्त 
  • शिंदे , होळकर ,गुरखा , भोसले उठावापासून अलिप्त 

उठावाचे परिणाम : 
  • कंपनीची सत्ता संपुष्ठात आली . 
  • लष्कराची पुनर्रचना  करण्यात आली. 
  • लॉर्ड स्टॅन्ले हे भारताचे पहिले भारत मंत्री बनले. 
  • लॉर्ड कॅनिग भारताचा व्हाईसराय बनला. 
  • मोघल सत्ता संपुष्ठात आली . 
  • कंपनीची सत्ता ब्रिटिश पार्लमेंटने आपल्या हाती घेतली. 

उठावासंबंधी उदगार: 
  • न. र. फाटक -- "१८५७ चा उठाव  म्हणजे शिपायांची भाऊगर्दी " 
  • वि.दा.सावरकर-- " १८५७ चा उठाव म्हणजे भारताचे पहिले स्वातंत्र्ययुध्ध ''
  • मौलाना आझाद -- ''हा उठाव सुसूत्र नियोजनातून झाला नव्हता . ''
  • रियासतकार देसाई --'' भारतातील जनतेतील असंतोषाचा स्फोट झाला ''




क्रांतिकारी चळवळ

वासुदेव  बळवंत फडके
 हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.
 महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. मातंगरामोशीधनगरकोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या  सैन्यात भरती केले. 
 घानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयांत फितुरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले! याचबरोबर साप-किरड्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी इनाम जाहीर केले.
या लढाईनंतर फडके अरब व रोहिल्यांकडून मदत मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानात गेले. तेथील निजामाच्या सेवेत असलेल्या अब्दुल हक आणि मेजर हेन्‍री विल्यम डॅनियेल या अधिकाऱ्यांनी फडक्यांचा पिच्छा पुरवला आणि त्यांना परत महाराष्ट्रात पळून येण्यास भाग पाडले.

  रासबिहारी बोस
आझाद हिंद सेनेची स्थापना  केली
व्हॉइसरॉय लॉर्ड्स हार्डिंग्स वर बॉम्ब हल्ला  केला



चंद्रशेखर आझाद
चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी (जुलै २३, १९०६ - फेब्रुवारी २७, १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांना भगत सिंग यांचे गुरू मानले जाते व ते एच.एस.आर.ए. संघटनेचे प्रमुख होते.


चाफेकर बंधू 


वासुदेव चापेकर व त्यांचे बंधू हे आद्य भारतीय क्रांतिकारकांमध्ये गणले जातात.

वासुदेव चापेकर यांनी दामोदर चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर या त्यांच्या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला.
त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले.

रँडच्या पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या भावांनी त्याच्या वधाचा कट रचला. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव साजरा
करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश
खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रँडवर जवळून गोळ्या झाडल्या. रँड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने
 ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.

चाफेकर बंधू निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर, तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा तुरुंगात
फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले, व तीनही चापेकर बंधू शहीद झाले.


विनायक दामोदर सावरकर

हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते



  • अभिनव भारत या संस्थेची स्थापन केली ..
  • १९०० मध्ये मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली . 
  • परदेशातून क्रांतिकारी कार्य चालवले 


क्रांतिकारी संघटना -

अभिनव भारत -
 १८९९ राष्टभक्त समूह त्याचे नाव १९०० ला मित्रमेळा नंतर १९०४ ला  त्याचे नाव  बदलून अभिनव भारत ठेवले .

अनंत   कान्हेरे  व सेनापती बापट हे अभिनव  भारत  या संघटनेचे कार्यकर्ते  होते .
अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन ची हत्या केली .

गदर संघटना -

गदर  संघटनेची स्थापना  अमेरिकेत झाली . 
लाला हरदयाळ, भाई परमानंद ,डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे इत्यादी प्रमुख नेते या संघटनेत  होते . 
१९१३ ला युगांतर आश्रम साप्ताहिक त्याचे नाव बदलून गदर  असे ठेवले . 

हिंदुस्थान सोसायलिस्ट रिपब्लिकन आर्मी -

१९२८ रोजी फिरोज शहा कोटला मैदानावर स्थापन झाली . 
भगत  सिंग ,राजगुरू,सुखदेव ,चंद्र शेखर आझाद इत्यादी प्रमुख नेते होते . 
भगत  सिंग व राजगुरू यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला  घेण्यासाठी  सॉर्डरची हत्या केली. 
भगत  सिंग व बुटकेश्वर दत्त यांनी  मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले . 
२३ मार्च १९३१ रोजी भागात सिंग,सुखदेव,राजगुरू याना लाहोर तुरुंगात  फाशी देण्यात आली . 
चंद्रशेखर  आझाद हे या संघटनेचे प्रमुख होते . 

अनुशीलन समिती 
बरिंद्रकुमार घोष  व भूपेंद्रनाथ दत्त हे या संघटनेचे प्रमुख होते . 
या संघटनेच्या संपूर्ण भारतात ५०० पेक्षा जास्त शाखा होत्या . 
माणिकतोळ येथे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते . 
खुदिराम बोस  व प्रफुल्ल  चाकी  यांनी किंग्स फोर्ड्स ला ठार मारण्याचा प्रयत्न केला . 






राष्ट्रीय सभा -

स्थापना :

  •       राष्ट्रीय सभेची स्थापना २८ डिसेम्बर १८८५ साली मुबई येथील गोपालदास संस्कृत पाठशाळा येथे झाली . 
  • योमेशचंद्र बॅनर्जी राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष होते . 
  • संस्थापक -- अॅलन ह्यूम 
  • सर्व भारतातून ७२ प्रतिनिधी उपस्थित होते . त्यामध्ये फिरोजशहा मेहता , लोकमान्य टिळक , आगरकर ,दादाभाई नौरोजी , न्यायमूर्ती रानडे ,न्यायमूर्ती तेलंग इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते. 
  • पहिल्या अधिवेशनाची नियोजित जागा पुणे येथे होती, परंतु पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या स्पार्श्वभूमीवर  ठिकाण बदलून मुंबई येथे पहिले अधिवेशन घेण्यात आले. 
  • राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत महत्वाचा पुढाकार ए . ओ . ह्यूम (सचिव) यांनी घेतला. 


राष्ट्रीय सभेची अधिवेशने:

अधिवेशन            ठिकाण                 अध्यक्ष                            इतर माहिती 

पहिले१८८५    मुंबई                       योमेधाचंद्र बॅनर्जी    ७२ प्रतिनिधी उपस्थित
दुसरे १८८६    कोलकाता          दादाभाई नौरोजी        पहिले पारशी अध्यक्ष 
तिसरे १८८७     चेन्नई               बुद्रद्दीन तय्यबजी        पहिले मुस्लिम अध्यक्ष 
चौथे १८८८     अलाहाबाद            ए.जे. यूल         -----------
सातवे १८९१     नागपूर       आनंद चार्लू                पहिले हिंदू अध्यक्ष 
सोळावे १९००   लाहोर          एन . जी.चंदावरकर   पहिले मराठी अध्यक्ष   
 १९०५          बनारस       गो. कृ.गोखले        भारतीय सेवक समाज स्थापना 
१९०६             कोलकाता   दादाभाई नौरोजी      चतुःसूत्रीची घोषणा 
१९०७             सुरत             रासबिहारी घोष        जहाल व मावळ फूट 
१९१६        लखनौ           बाबू अंबिका चरण मुझुमदार      लखनौ करार 
१९१७     कोलकाता       ऑनी बेझंट               प्रथम महिला अध्यक्ष 
१९२४      बेळगाव            महात्मा गांधी       ----
१९२५     कानपुर           सरोजिनी नायडू         भारतीय महिला अध्यक्ष 
१९२९     लाहोर          पंडित जवाहरलाल नेहरू   पूर्ण स्वराज्याची मागणी 
१९३१    कराची          सरदार पटेल                मूलभूत हक्कांचा ठराव 
१९३६      फैजपूर       जवाहरलाल नेहरू       ग्रामीण भागातील पहिले अध्यक्ष 
१९३८     हरिपुरा        सुभाषचंद्र भोस     -----
१९५५   आवडी          यु. एन. वेबर           काँग्रेसने समाजवादाचा स्वीकार 
१९६५   दुर्गापूर         के. कामराज            ७५ वे अमृतमहोत्सवी 
१९८५     मुंबई           राजीव गांधी              शताब्दी . 




राष्ट्रसभेतील महत्वाचे नेते :

मवाळ नेते :


१) न्यायमूर्ती गोविंद रानडे :

  •  न्यायमूर्ती गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे झाला. 
  • मुंबई हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम केले . 
  • इ. स . १८६५ साली पुण्यात स्थापण झालेल्या विवाह उत्तेजक मंडळाचे व सार्वजनिक सभेचे ते मुख्य आधारस्तंभ होते . 
  • रानडे हे देशातील सर्वांगीण सुधारणेचा पुरस्कार करणारे होते. 
  • भारतीय अर्थशाश्राचा पाया घातला . 
  • ''थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला उब देऊन जिवंत करण्याचे कार्य न्यायमूर्ती गोविंद रानडे यांनी केले'' .----लोकमान्य टिळक 
  • साहित्य संपदा --- मराठी सत्तेचा उदय 

दादाभाई नौरोजी :
  • नवसारी गुजरात येथे पारशी कुटुंबात झाला.
  • मुंबईच्या प्रशिध्द एलिफ़िस्टन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली . 
  • १८६१ साली रास्त गोफ्तार या साप्ताहिकाची सुरुवात केली. 
  • १८८५ साली राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत महत्वाचा सहभाग 
  • '' पॉवर्टी अँड ऊन ब्रिटिश रुल  इन इंडिया '' या पुस्तकातून भारतीय संपत्तीचा निचरा कसा होत आहे हे त्यांनी स्पष्ट केले. 
  • भारतीय अर्थशाश्राचे जनक दादाभाई नौरोजी यांना म्हटले जाते. 
  • राष्ट्रसभेच्या व्यासपीठावरून प्रथमच स्वराज्याची मागणी केली. 
फिरोजशहा मेहता :  
  • मुंबई येथे एका व्यापारी कुटुंबात जन्म  झाला. 

  • १८८२ ते १८८३ या काळात त्यांनी इल्बर्ट बिलाविरुद्ध मोठे आंदोलन केले.
  • १८८४ ते १८८५ या काळात त्यांची मुंबई महानगरपालिकेवर निवड झाली.
  • १९०४ साली त्यांनी लॉर्ड कर्झनच्या विद्यापीठ कायद्यावर तीव्र टीका केली.
  • १९०९ साली काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. १८९० साली सुद्धा ते कोलकाता येथेच भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 
  • १९१३ साली त्यांनी 'बॉम्बे क्रोनिकल" हे वृत्तपत्र सुरु केले.

गोपालकृष्ण गोखले :



जहाल कालखंड -- १९०५ ते १९२० 


  • जहाल नेत्यांमध्ये लो. टिळक , लाला लजपतराय , बिपीनचंद्र पाल , बाबू अरविंद घोष , सुब्रह्मण्यम अय्यर , यांचा समावेश होतो . 
  • लोकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी १८९३ साली गणपती उत्सव व १८९५ साली शिवजयंती उत्सव सुरु केले . 
  • जहालवादालाच नवराष्ट्रवाद असेही म्हटले जाते . 
  • स्वराज्य , स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण ही जहाल नेत्यांची चतुः सूत्री होती. 



गोपाळ गणेश आगरकर

जन्म: १४ जुलै १८५६
टेंभू, तालुका -कराड , जि -सातारा
मृत्यू: १७ जून १८९५
पुणे, महाराष्ट्र
चळवळ: समाजसुधारणा
पत्रकारिता/ लेखन: केसरी
सुधारक
धर्म: हिंदू
वडील: गणेश आगरकर
पत्नी: यशोदाबाई गोपाळ आगरकर
अपत्ये: यशवंत , माधव, व २ मुली


आरंभीचा काळ
आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात, एका गरीब कुटुंबात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च
भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी माधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी
आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कर्‍हाड, अकोला, रत्नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले.
 पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला.

कारकीर्द
आगरकर हे बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.

पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना ते व लोकमान्य टिळक एकत्र आले. तोपर्यंत स्वदेशसेवेची प्रेरणा दोघांच्याही मनात जागी झाली होती. दिनांक १ जानेवारी,
१८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले.
आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.

पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी 24 ऑक्टोबर 1884 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली
 फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.

उल्लेखनीय कार्य
१८८४ साली बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' स्थापली. १८८८ साली त्यांनी 'सुधारक' हे
वृत्तपत्र सुरू केले.


गोपाळ गणेश आगरकर हे, भौतिकता - ऐहिकता, बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा
करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन,परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान
 निर्माण करण्याचे श्रेय गोपाळ आगरकरांकडे जाते.

राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे.

 बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून
 १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘सुधारक (वृत्तपत्र)’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद,
भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी
अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते.
 इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती.

वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.




राजश्री शाहू महाराज 



चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज, (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२) हे कोल्हापूर राज्याचे इ.स. १८८४-१९२२ सालांदरम्यान छत्रपती होते.
 शाहू महाराज प्रभावी समाजसुधारक होते. शाहु महाराज सुधारणावादी होते.

शाहू महाराजांचा जन्म जून २६, इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे जयसिंगराव (आप्पासाहेब),
आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी
यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२
सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे मे ६, इ.स. १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

जन्मदिवस
शाहू महाराजांचा २६ जून हा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो.
 त्यादिवशी कोल्हापूरमध्ये आणि अन्यत्र काही ठिकाणी बरेच सार्वजनिक कार्यक्रम होतात.

कार्य
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा
 भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.
इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.
बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली.
 वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाला.

स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली.
म्हणूनच त्यांचा देशभरात "महाराजांचे महाराज‘ असा गौरव होतो..शाहू महाराजांना "राजर्षी" ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यातला.

अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली.
गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा असेही
उपक्रम त्यांनी राबवले.शाहू राजे हे त्यांच्या कर्तृत्वामुळे नावाप्रमाणेच यशवंत राहिले. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व कार्याचा वारसा मोठ्या समर्थपणे घेऊन जाण्याचे
कार्य करणारा एक महान मानवतावादी राजा म्हणून राजर्षी शाहू महारजानी आपली ओळख निर्माण केली.
 या व्यापक दूरदृष्टीच्या राजाने त्याकाळी राजेशाही असतांनासुध्दा सामाजिक बंधूभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे,
कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये आजच्या लोकशाहीतील शासनालाही करणे शक्य होत नाही. असे अद्वितीय स्वरुपाचे कार्य केले.

मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून या निधड्या छातीच्या समाजसुधारकाने ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली. नुसती घोषणा करुन थांबणारे ते राजे नव्हते तर त्वरीत अंमलबजावणी करुन संबंधीत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्या अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. राजर्षीवर अनेक प्रकारचे आरोप केले.त्यांनी अस्पृश्यांना (त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या) राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकर्‍या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली.

त्यावेळेस धर्मव्यवस्थेने स्त्रियांना अतिशय उपेक्षित ठेवले. त्यांचे हक्क, अधिकार, नाकारले, स्त्री म्हणजे केवळ चूल व मूल या पुरतीच मर्यादित ठेवली त्याकाळी धर्माच्या
नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची अतिशय विचित्र पद्धत आपल्या देशात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली. जातीभेदाचे प्रस्त नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला. परंतु आज एकविसाव्या शतकामध्ये आणि लोकशाही शासनव्यवस्थेमध्ये मात्र स्त्रिभ्रूणहत्या, हूंडाबळी सारख्या अनेक माध्यमातून स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात बळी दिला जात आहे. आज स्त्रीयांना या संकटातून बाहेर काढावयाचे असेल तर राजर्षी शाहूंचा स्त्रीविषयक व्यापक दृष्टीकोनच आपण स्विकारणे ही काळाची गरज आहे.


शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थांची स्थापना,
राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार
या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा
वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन राधानगरी नावाचा प्रकल्प उभा केला.
जेणेकरून भविष्यात माझ्या रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही ही दूरदृष्टी ठेवून राधानगरी धरणाची निर्मिती केली. राजषी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत,
चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.


आज शाहू राजांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या सर्वत्र साजऱ्या केल्या जातात. परंतु केवळ एवढ्याने त्यांच्या विचार व कार्याचे चिज होणार नाही.
शाहूंचा लढा हा समतेसाठी हेाता. आत्मसन्मासाठी होता. वर्णवर्चस्वाच्या अहंकारी प्रवृत्ती विरुध्द होता.



जोतीराव गोविंदराव फुले 

(एप्रिल ११ , इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०), महात्मा फुले नावाने प्रसिद्ध, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. 

त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि
 महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८९० या साली मिळाली.
 'शेतकऱ्यांचे आसूड' हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला.


जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला.
 जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील
आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ
 लागले व तेच नाव पुढे रूढ झाले.
जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांचेशी झाला.
प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन
 हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.



बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला.
त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली.
महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली.
त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. जोतीरावांनी पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन
शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे
फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.


सामाजिक कार्य
मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला.
 सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी
 भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते.

‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना
मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते.
त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे
विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते.



1855 - 'तृतीय रत्न' नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).

1868 - 'ब्राम्हणांचे कसब'

1873 - 'गुलामगिरी' हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केले.





आचार्य विनोबा भावे

  • जन्म - 11 सप्टेंबर 1895 गगोदा (रायगड).
  • मृत्यू - 11 नोव्हेंबर 1982.
  • आचार्य विनोबा भावे हे म. गांधीचे मानसपूत्र होते.
  • भावे यांचे विनायक नरहर भावे, हे मूळ नाव.
  •  1921 - वर्ध्याजवळ पवणारा येथे आश्रमाची स्थापना.
  •   संम्ययोगी समाज निर्मितीचा श्रीगणेश केला.
  •  18 एप्रिल 1951 भूदान चळवळ, आंध्रप्रदेशातील पोचमपल्ली येथून सुरवात.
  •  1923-महाराष्ट्र धर्म मासिक.
  • गीताई - भागवतगीतेचे समश्लोकी भाषा
  •   मधुकर(निबंधसंग्रह  गीता प्रवचने.
  •  'स्वराज्य शस्त्र' हा ग्रंथ.
  •    विचर पोथी.
  •  जीवनसृष्टी.
  •  अभंगव्रते.
  •   गीताई शब्दार्थ कोश.
  • गीताई - धुले येथील तुरुंगात सांगितली व सोने गुरुजींनी लिहून घेतली.
  •  वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून निवड.



धोंडो केशव कर्वे


  • जन्म - रत्नागिरी, 18 एप्रिल 1858.
  • मृत्यू - 9 नोव्हेंबर 1962.
  • 1942 - बनारस विद्यापीठाची डि. लिटू.
  • 1958 - भारतरत्न. जन्मशताब्दी वर्ष.
  • कर्वे यांना महर्षि ही पदवी जनतेने दिली.
  • स्त्री शिक्षण हा यांच्या कार्याचा केंद्रबिंदू.
  •  1893 - विधवा विवाहोत्तेजक मंडळ
  •   1 जानेवारी 1899 - अनाथ बालिका आश्रम.
  •   1907 - हिंगणे महिला विद्यालय.
  •  1910 - निष्काम कर्मकठ.
  •   1916 - महिला विद्यापीठ, पुणे.
  •   1916 - महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडल.
  •   1 जानेवारी 1944 - समता संघ.
  •  1945 - पुणे बलअध्यापक मंदिर, शिशुविहार.
  •   1948 - जातींनीर्मुलन संघ.
  •  1918 - पुणे - कन्याशाळा.
  •  1960 - सातारा - बलमनोहर मंदिर.
  •   मानवी समता - मासिक.
  •   1893 - विधवेशी पुनर्विवाह.
  •  1894 - पुनर्विवाहितांचा मेळावा.
  •  1915 च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष
  • 1928 - आत्मवृत्त या नावाचे आत्मचरित्र.
  •   'अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार' - आचार्य अत्रे.

राजर्षि शाहू महाराज :


  • जन्म - 16 जुलै 1874.
  • मृत्यू - 6 मे 1922.
  • एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्‍या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना 'राजर्षी' ही पदवी बहाल करण्यात आली.
  • महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्‍यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.
  • भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.
  • एक कल्याणकारी राजा.
  • 1901 - मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).
  •   नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.
  •  1902 - राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.
  •  15 नोव्हेंबर 1906 - किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.
  • 1907 - मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.
  •  1911 - जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.
  •  1911 - शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.
  • 1917 - माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
  • 14 फेब्रुवारी 1919 - पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.
  •  लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.
  •  पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.
  •  जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना  1894 - बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.
  • 1917 - विधवा विवाहाचा कायदा.
  • 1918 - आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.
  •  1918 - महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.
  •  वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.
  •  1920 - माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन.
  • 1895 - गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.
  •  1899 - वेदोक्त प्रकरण - सत्यशोधक चळवळीचे ब्राह्यणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत.यामुळे पुरोहितगिरी व ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह.
  •  1906 - शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.
  • 1907 - सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.
  • 1911 - सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.
  • 1911 - भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.
  • 1912 - कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.
  • 1916 - निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना.
  • 1918 - कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.
  •  1918 - आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.
  • 1919 - स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा कायदा.
  • 1920 - घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.
  •  1920 - हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
  •    राज्य सोडावे लागले तर बेहत्तर, पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही.
  •   कामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या, हा संदेश. He Was a King But a Democratic King - भाई माधवराव बागल.
  •   शाहू राजा नुसता मराठा नव्हता, तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होतो. - वि. रा. शिंदे.
  •  टीकाकारांकडून 'शुद्रांचा राजा' असा उल्लेख.






विठ्ठल रामजी शिंदे :


  • जन्म - 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक.
  • मृत्यू - 2 जानेवारी 1944.
  • 1932 - 33: बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.
  • 'महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी' गं. बा. सरदार.
  • 'निष्काम कर्मयोगी', भाई माधवराव बागल.
  • जनतेकडून 'महर्षी' ही पदवी.
  • अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला.
  •  1905 - मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.
  •   18 ऑक्टोबर 1906 - डिप्रेस्ड क्लास मिशनची मुंबई येथे स्थापना. पहिले अध्यक्ष - न्या. चंदावकर.
  •  1910 - जेजूरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ.
  •  अनाथाश्रम - रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे देवदासी प्रथा व व्यसनमुक्ति कार्य.
  •   ब्राहय समाजाच्या प्रसारासाठी ब्राहय पोस्टल मिशनची स्थापना.
  •  23 मार्च 1918 - अस्पृश्यता निवारक संघ.
  • 1918 - मराठा समाजात जागृतिंनिर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना.
  •  1920 - पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था.
  •  1937 - स्त्रियांसाठी अहिल्याश्रम.
  •  1923 - तरुण ब्रहयो संघ.
  •  1937 - बहुजन पक्षाची स्थापना.
  •  स्त्रियांसाठी आर्यमहिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ.
  •   वृद्धंनसाठि संगत सभा.
  •   प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेत लेखन.
  •  1903 - प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिक.
  •  1903 - अ‍ॅमस्टारडॅम येथे जागतिक धर्म परिषदेत 'हिंदुस्थानातील उदारधर्म' हा निबंध वाचला.
  •  Thiestic Directory जागतिक उदार धर्माची माहिती सांगणारा धार्मिक ग्रंथ लिहाला.
  •   Untouchable India
  •    माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र .
  • शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम.
  •  अस्पृश्यानसाठी रूपी फंड हा उप्रकार.
  •   1904 - मुंबई धर्म परिषद.
  •  1905 - अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्योध्दाराची शपथ.
  •  1918 - मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरविली. अध्यक्ष सायाजीराव गायकवाड.
  •  1924 - वायकोम सत्याग्रह (त्रावनकोर), अस्पृश्य सत्याग्रहात सहभाग.
  •  1935 - बडोदा मराठी साहित्य संमेलनात तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष.
  •   स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपान मधील विद्या पिठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठे व्हावीत, असे मत.
  •  शाहू महाराजांनी क्षात्र जगतगुरुपदी मराठा व्यक्ति नेमल्याबद्दल निषेध केला.





गोपाल गणेश आगरकर:

  • जन्म : 14 जुलै 1856, करहाड तालुक्यातील टेंभू.
  • मृत्यू : 17 जून 1895,पुणे
  • 1 जानेवारी 1880 – चिपळूणकर, टिळक व अगरकर ‘न्यू इंग्लिश स्कूल ’ची स्थापना केली.
  • 1884 – डेक्कन एजुकेशन सोसायटी ची स्थापना.
  • बुद्धीप्रामान्यवाद, वैज्ञानिक द्रुष्टिकोण, एहिक जीवनाची स्मृधता यावर भर .
  • 1881 – लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीचे संपदकत्व .
  • 15 आक्टोंबर 1888 – ‘सुधारक ’ साप्ताहिक.
  • गुलामांचे राष्ट्र या पुस्तकात हिन्दी लोकांचा आळशी वृत्तीची टीका.
  •   स्त्रियांनी जकिते घातलीच पाहिजेत याविषयावर निबंध.
  •  अकोल्यातल्या वर्हाघड समाचार या वर्तमान पत्रातून लेखन.
  •  शेक्सपिअरच्या हॅल्मेट या नाटकाचे विकारविलासित या नावाने मराठी रूपांतर.
  •  'डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस' हे पुस्तक.
  •    हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधात ब्रिटीशांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका.
  •   इष्ट असेल ते बोलणार......
  •  राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्यला अधिक महत्व.
  •   हर्बर्ट स्पेन्सरच्या सोशॉलॉजी व एथिक्स आणि जॉन मिलच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव.
  •  बुध्दिप्रामाण्यवाद व व्यक्तीस्वातंत्र्य या दोन तत्वांना महत्व.
  •   ऐहिक जीवन समृद्ध करावे, पारलौकिक जीवनाचा विचार करणे व्यर्थ, असे
  •    जिवंतपणी स्वतः ची प्रेतयात्रा पहावी लागलेले समाजसुधारक.


भाऊराव पायगोंडा पाटील :


  • जन्म - 22 सप्टेंबर 1887, कुंभोज, जी. कोल्हापूर.
  • मृत्यू - 9 मे 1959.
  • महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे त्यांना म्हटले जात.
  • 22 सप्टेंबर 1887 पहिला श्रमप्रतिष्ठादिन.
  • भाऊराव पाटील यांना 'कर्मवीर' ही पदवी गाडगे महाराजांनी दिली.
  • 22 सप्टेंबर हा दिवस श्रमप्रतिष्ठा दी म्हणून साजरा केला जातो.
  • ग्रामीण शिक्षणप्रसारासाठी संपूर्ण आयुष्य वाहणारा द्रष्टा समाजसुधारक.
  •  1910 - स्थानिक लोकांच्या मदतीने दूधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळाची स्थापना, (1924 साली संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे.)
  • 4 ऑक्टोबर 1919 - काले, ता. कर्‍हाड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना.(1924 साली संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे.)
  • 1924 - छत्रपती शाहू बोर्डिंग, सातारा येथे स्थापना (ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी). छत्रपती शाहू बोर्डिंगचे उद्घाटन म. गांधीच्या हस्ते झाले. बोर्डिंगचे पहिले अध्यक्ष हमीद आली होते.
  •   1932 - पुणे कराराचे स्मरण म्हणून मुलींसाठी Union Boarding House स्थापन.
  •   1935 - प्राथमिक शिक्षक प्रशिक्षणासाठी सातारा येथे Silver Jubilee Rural Training College स्थापले.
  •   1940 - महाराजा सायाजीराव हायस्कूल ही रयत शिक्षण संस्थेची पहिली माध्यमिक शाळा सुरू केली (सातारा).
  • 1947 - छत्रपती शिवाजी कॉलेज महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे स्थापले.
  •     स्वावलंबी शिक्षणासाठी 'कमवा व शिका योजना'
  •  गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यासाठी लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल एज्यूकेशन फंड स्थापना ही योजना राबवली.
  •  स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद.
  •  श्रमाच्या प्रतिष्ठेला शैक्षणिक तत्वज्ञानात महत्वाचे स्थान.
  •   तुम्हास जर एक वर्षाची तयारी करायची असेल, तर धान्य पेरा ! शंभर वर्षाची तयारी करायची असेल, तर माणसे पेरा ! हा संदेश.
  •   भाऊराव का कार्यही उनका सच्चा किर्तिस्तंभ है - म. गांधी.
  •  'जगातील कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसलेल्या कर्मवीर अण्णाना जगातील सर्व विद्यापीठांच्या पदव्या दिल्या तरी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव कमीच होईल ' डॉ. पंजाबराव देशमुख यांची प्रतिक्रिया.

महत्वाचे दिनविशेष

<सामान्य ज्ञान महत्वाचे दिनविशेष   १) जागतिक दिनविशेष #    जानेवारी  * १ जाने --जागतिक धूम्रपान दिन *१० जान...