भूगोल

महाराष्ट्राचा भूगोल

  • महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली.त्यावेळी महाराष्ट्रात २६ जिल्हे व ४ प्रशासकीय विभाग होते.सध्या महाराष्ट्रात ३६ जिल्हे व ६ प्रशासकीय विभाग आहेत. 

  • अ] महाराष्ट्राची प्राथमिक माहिती    :

  •   #अक्षांश विस्तार ----१५.८* उत्तर अक्षवृत्त ते २२.१* उत्तर अक्षवृत्त
  •  #रेखांश विस्तार ----७२.६* पूर्व रेखावृत्त ते ८०.९८* पूर्व रेखावृत्त #
  • पूर्व -पश्चिम लांबी ----८०० कि.मी.
  •  #दक्षिणोत्तर रुंदी ---७२० कि. मी. 
  • #क्षेत्रफळ----३,०७,७१३ चो. कि.मी.
    #राजधानी ----मुंबई 
  • #उपराजधानी---नागपूर
  •  #प्रशाकीय विभाग---६ 
  • # जिल्हे व तालुके ---३६ जिल्हे व ३५५ तालुके
  •  #महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा ---गडचिरोली
  •  #महाराष्ट्राच्या अतिदक्षणेकडील जिल्हा --सिंधुदुर्ग 
  • #महाराष्ट्राच्या अतिiउत्तरेकडील जिल्हा--नंदुरबार 
  •  संपुर्ण साक्षर पहिला जिल्हा – सिंधुदुर्ग 
  • सर्वात कमी साक्षर जिल्हा – नंदूरबार
  •  महारास्थापना : ०१ मे १९६०
  •  राज्यभाषा –मराठी 
  • पंचायत समित्या – ३५१
  •  एकूण जिल्हा परिषदा – ३४
  •  आमदार विधानसभा – २८८ 
  • आमदार विधानपरीषद – ७८
  •  महाराष्ट्र लोकसभा सदस्य – ४८ 
  • सुमद्रकिनारा – ७२० किमी
  •  नगरपालिका – २३० 
  • महानगरपालिका – २६ 
  • शहरी भाग – ४५%
  •  ग्रामीण भाग – ५५% 
  • लोकसंष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या – मुंबई उपनगर
  •  महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा – नंदूरबार
  •  महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा – गडचिरोली
  •  महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा – बीड
  •  महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा – नंदूरबार 
  • महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा – गोंदिया 
  • महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – अहमदनगर
  •  महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – मुंबई शहर 
  • महाराष्ट्रातील उंच शिखर – कळसूबाई (१६४६ मी)
  •  महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी – गोदावरी
  •  महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग – न्हावाशेव पळस्पे २७ किमी 
  • पहिले मातीचे धरण – गंगापूर, गोदावरी नदीवर
  •  महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा असलेले शहर – मुंबई 
  • जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ – नागपूर 
  • भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर --मुंबई   


महाराष्ट्रातील नवीन जिल्हयांची निर्मिती





*·        सिंधुदुर्ग----------------1 मे 1981 ला रत्नागिरी जिल्ह्यातून विभाजन
*·        जालना-----------------1 मे 1981 ला औरंगाबाद जिल्ह्यातून विभाजन
*·        लातूर-------------------16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद जिल्ह्यातून विभाजन
*·        गडचिरोली--------------26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपुर जिल्ह्यातून विभाजन
*·        मुंबई उपनगर---------1990 ला बृहन्मुबई मधून विभाजन
*·        वाशिम-----------------1 जुलै 1998 ला अकोला जिल्ह्यातून विभाजन
*·        नंदुरबार----------------1 जुलै 1998 ला धुळे जिल्ह्यातून विभाजन
*·        हिंगोली----------------1 मे 199
9 ला परभणी जिल्ह्यातून विभाजन

*·        गोंदिया----------------1 मे 1999 ला भंडारा जिल्ह्यातून विभाजन
*·        पालघर-----------------2 जून 2014 ला ठाणे जिल्ह्यातून विभाजन



  •   ब] सभोतालची राज्ये:


  • ६ राज्ये व १ केंद्रशासित प्रदेश अशाप्रकारे एकूण ७ राज्यांच्या सीमा महाराष्ट्राला लागून आहे.यात मध्यप्रदेश या राज्याची सीमा सर्वाधिक लांबीची आहे.तर गोवा या राज्याची सीमा सर्वात कमी लांबीची आहे. 

                  १] महाराष्ट्राच्या उत्तर दिशेस असणारी राज्ये--मध्यप्रदेश

           २] महाराष्ट्राच्या पूर्व दिशेस असणारे राज्ये---छत्तीसगड

  •  ३] महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेस असणारे राज्ये--गोवा व कर्नाटक
  •  ४]महाराष्ट्राच्या आग्न्येय दिशेस असणारे राज्ये---तेलंगणा 
  •  ५]महाराष्ट्राच्या वायव्य दिशेस असणारे राज्ये--गुजरात,दादर व नगर हवेली

   क] महाराष्ट्राची मानचिन्हे :


 १] महाराष्ट्राचा राज्य प्राणी -----शेखर खार

 २] महाराष्ट्राचा राज्य पक्षी----हरियाल/हरावत

 ३] महाराष्ट्राचा राज्य वृक्ष----आंबा

 ४] महाराष्ट्राचा राज्य फुल--जारूल/तामण

 ५] महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू--ब्लू मॉरमॉन

 ६]राजभाषा--मराठीं 



महाराष्ट्राची प्राकृतिक रचना :

        महाराष्ट्रातील बहुतांशी भाग हा बेसॉल्ट खडकाचा बनलेला आहे. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग खालीलप्रमाणे :

१) कोंकण --

  1. कोकणाची निर्मिती सह्याद्री पर्वताचा प्रस्तर भंग होऊन झालेली आहे. 
  2. उत्तरेकडे दमणगंगेच्या खोऱ्यापासून दक्षिणेला तेरेखोल खाडीपर्यंतचा ७२० कि.मी. लांबीचा प्रदेश म्हणजेच कोंकण किनारा होय . कोंकण किनाऱ्याची रुंदी ४० ते ८० कि. मी. आहे. 
  3. कोंकण किनाऱ्यावर लहानमोठी ४९ बंदरे आहेत. 
  4. कोंकण किनाऱ्यावरील तेल क्षेत्र --बॉंबे हाय व वसई हाय . 
  5. कोंकण किनाऱ्यावरील बेटे-- मुंबई, साष्टी, घारापुरी, अंजदीव, खांदेरी-उंदेरी. 
  6. कोंकण किनारपट्टीवरील खाड्या --बाणकोट, दाभोळ, मनोरी, पनवेल, जयगड, राजापूर, विजयदुर्ग, माहीम,चिपळूण इत्यादी ..                                                                                                                                                                                                                                                                                                                    

२)  पश्चिम घाट --

  1. सह्याद्री पर्वताची निर्मिती हि प्रस्तर भंगामुळे झाली. 
  2. सह्याद्री पर्वत रांग  महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे ,यामध्ये अनेक नद्यांचा उगम झालेला आहे. 
  3. सह्याद्रीच्या उपरांगा --सातमाळ डोंगर, अजिंठा डोंगर,हरिश्चंद्र डोंगर रांग , शंभू महादेव डोंगर रांग 
  4. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर-- कळसुबाई अहमदनगर *( १६४६ मी. )
  5. सह्याद्री पर्वत रांगेतून अनेक रस्त्यामुळे घाट निर्माण झाले आहेत. हे घाट देश व कोकण याना जोडण्याचे काम करतात.                                                                                                                                                                 

३) दख्खनचे पठार किंवा देश --

  1. दख्खनचे पठार हे मुख्यतः बेसॉल्ट खडकापासून बनले आहे. 
  2. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना बेसॉल्टची जाडी कमी कमी होत जाते . 
  3. हा अतिशय प्राचीन प्रदेश असून याची निर्मिती ७ कोटी वर्षांपूर्वी झाली आहे. 


महाराष्ट्रातील डोंगररांगा :

     जिल्हा                            पर्वत , डोंगररांग , टेकडी
* नाशिक                   - साल्हेर मुल्हेर, सह्याद्री , गाळणा ,सातमाळ डोंगर रांगा 
* धुळे                        -  सातमाळा , मुदखेड , बालाघाटचे डोंगर 
* जालना                   - अजिंठयाची रंग व जांबुवंत टेकडी 
* औरंगाबाद            - अजिंठा , सातमाळ , सुरपालनाथ 
* हिंगोली                  - अजिंठयाची डोंगर रांग , सातमाळा , निर्मल , मुदखेड 
* परभणी                  - उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर व दक्षिणेस बालाघाट डोंगर रांग 
* लातूर                     - बालाघाटचे  डोंगर 
* बीड                       - बालाघाटचे  डोंगर 
* उस्मानाबाद            - बालाघाट , तुळजापूर व नळदुर्ग डोंगर 
* अमरावती                - गावीलगडच्या राग , सातपुडा , पोहऱ्याचे व चिरोलीचे डोंगर 
* नंदुरबार                  - सातपुडा व तोरणमाळचे डोंगर 
* पुणे                         - सह्याद्री , हरिशचंद्र , शिंगी , तासूबाई , पुरंदर
* ठाणे                         - सह्याद्री डोंगररांग 
* मुंबई शहर  व            - पाली , शिवडी , खांबाला 
    उपनगर                   - अँटॉप हिल , मलबार हिल 
* सिंधुदुर्ग व रत्नागिरी       - सह्याद्री 
* सातारा                    - सह्याद्री , परळी , महादेव, सीताबाई रंग , बनमोळी 
* कोल्हापूर                  - पन्हाळा , उत्तर व दक्षिण दूध गंगा 
* गडचिरोली               - टिपागड , चिरोली, भामरागड , सिरकोड , सुरजागड
* वर्धा                         - रावणदेव , गरमसूर , ब्राह्मणगाव टेकड्या 
* भंडारा                  - भीमसेन टेकड्या 
* यवतमाळ               - अजिंठ्याचे  डोंगर 
* अहमदनगर              -  कळसुबाई , सह्याद्री , हरिशचंद्र डोंगर रांग 
* सांगली                 - होनाइ , मुचुनडी ,आडवा 
* सोलापूर               - महादेव , बालाघाट , शुकाचार्य 

महाराष्ट्रातील महत्वाची शिखरे


शिखर          उंची(मी) जिल्हा

कळसुबाई      १६४६ अहमदनगर
साल्हेर          १५६७ नाशिक
महाबळेश्वर    १४३८ सातारा  
हरीश्चंद्रगड    १४२४ अहमदनगर
सप्तशृंगी        १४१६ नाशिक
तोरणा          १४०४ पुणे
अस्तंभा        १३२५ नंदुरबार
त्र्य्ब्केश्वर      १३०४ नाशिक
तौला          १२३१ नाशिक
वैराट          ११७७ अमरावती
चिखलदरा   १११५ अमरावती
हनुमान       १०६३ धुळे

महाराष्ट्रातील महत्वाच्या नद्या : 

  महाराष्ट्रातील महत्वाच्या नद्या व उपनद्या

नद्या व उपनद्या :

१) गोदावरी :-


  *उगम --   त्र्यंबकेश्वर  (नाशिक )
  • एकूण लांबी --१४५० कि.मी. , महाराष्ट्रातील लांबी ६६८ कि. मी. 
    • उजव्या बाजूने उपनद्या  :- दारणा, प्रवरा, मुळा, बोरा, सिंदफणा,          (बिंदुसरा),       कुंडलिका, सरस्वती.
    • डाव्या बाजूने उपनद्या  :- कादवा, शिवना, खाम, खेळणा


गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असे सुद्धा म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते. भीमा, वैनगंगा, इ. उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.





२) भीमा नदी :-


  • एकूण लांबी --८६७ कि.मी.
  • उगम--भीमाशंकर ( पुणे ) 
    • उजव्या बाजूने :- भामा, इंद्रायणी, मुळा-मुठा, पवना, वेळ, क-हा,          नीरा, माण, बोर.
    • डाव्या बाजूने :- कुकडी, पुष्पावती, मीना, घोड, भोगावती, बोर

भीमा नदी
 पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरयेथे तीचा उल्लेख चंद्रभागा असा केला जातो. ती महाराष्ट्रात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून मिळते.
नीरा नदी ही सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर-नीरा या गावाजवळ कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदी भीमेस मिळते. पाणलोट क्षेत्रफळ 46,184 चै. कि. मी.
महाराष्ट्रात पावसाळ्यात अनेकदा भीमेला पूर येतो.भीमा नदीवर एकूण बावीस धरणे आहेत. मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम अहमदनगर जिल्हयात रांजणगाव सांडस येथे होतो.

३) नर्मदा नदी :-

* उगम -- मध्यप्रदेश 
• नंदुरबार जिल्ह्याची वायव्य सरहद्दीवरून वाहते.
*अरबी समुद्रास जाऊन मिळते 

४) कृष्णा नदी :-

•उगम-- महाबळेश्वर 
* लांबी -- महाराष्ट्रात २८२ कि. मी.  व एकूण १२८० कि.मी 
* गोदावरी व  कावेरी यादरम्यानची प्रमुख नदी.
• उगम : धोम - महाबळेश्वर.
• उजव्या बाजूने :- कोयना, वारणा, पंचगंगा [कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती व सरस्वती (गुप्त)], दुधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, ताम्रपणी..
• डाव्या बाजूने :- येरळा, नंदला, अग्रणी



 ही दक्षिणी भारतातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ही नदी महाबळेश्वरजवळ उगम पावून सुमारे १,३०० कि.मी. अंतर पार करत आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते.
 वाटेमध्ये ती कर्‍हाड, औदुंबर, सांगली, नरसोबाच्या वाडीवरून कर्नाटक राज्यात प्रवेश करते. महाराष्ट्र राज्यातील कृष्णा नदीचा प्रवास २८१ कि.मी. आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेली कृष्णा नदी पुढे पूर्वेकडे आंध्र प्रदेशात जाते.
 कर्नाटकात कृष्णेला दक्षिणेकडून येणारी घटप्रभा नदी मिळते. 
आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या सीमेवर महाराष्ट्रातून येणारी भीमा नदी व कृष्णा यांचा संगम होतो. कृष्णा नदी आंध्र प्रदेशातल्या मच्छलीपट्टणमच्या दक्षिणेस बंगालच्या उपसागराला मिळते. मुखाजवळ तिचा प्रवाह ३ शाखांत विभागला जातो व त्रिभुजप्रदेश निर्माण होतात. कृष्णा नदीच्या खोर्‍याचा आंध्र प्रदेशांतील भाग अधिक विस्तृत व सुपीक आहे. तिच्या उगमाकडील भागात पावसाचा पाणीपुरवठा कमी असल्याने उगमाकडे उन्हाळ्यात पाणी खूप कमी असते.
आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर हे कृष्णा नदीवरील मोठे धरण आहे. 

५) तापी नदी :-

•उगम-- सातपूडा पर्वतात मुल्ताई येथे. 
* उजव्या बाजूने  :- चंद्रभागा, भुलेश्वरी, नंद, वान, गोमई.
• डाव्या बाजूने.:- कापरा, सिपना, गाडगी, डोलर, (अमरावती जिल्ह्यातील तापीच्या उपनद्या) पेढी, काटेपुर्णा, मोरणा, मण, नळगंगा, बिसवा, वाघुर, गिरणा (अरम, लितूर, मोसम) बोरी, पांझरा, बुराई



६) इंद्रायणी नदी 

  ही नदी पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. पुढे टाटा धरणामुळे नदी लुप्त होते आणि धराणापासून परत सुरू होते.लोणावळा शहरातील इंद्रायणीचा प्रवाह साधारणपणे सुमारे ४ किलोमीटरचा आहे. शहरातले नदीपात्र अत्यंत अरुंद आहे. कामशेत रेल्वे स्टेशनजवळ ते पात्र बर्‍यापैकी रुंद आहे. आळंदी गावातून वहात वहात पुढे जाऊन इंद्रायणी नदी ही भामा नदीला घेऊन तुळापूर गावाजवळ भीमा नदीस मिळते.


७) वैनगंगा नदी 

 ही महाराष्ट्रातील विदर्भातील एक महत्त्वाची नदी आहे. या नदीचा उगम मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून ६४० मीटर उंचीवर झाला आहे. तिथून ती बालाघाट जिल्ह्यातला सुमारे ९८ किलोमीटर प्रवास करून विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यात प्रवेश करते. विदर्भात ती भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, आणि गडचिरोली इतक्या जिल्ह्यांमधून वाहते.
अंधारी, कथणी, कन्हान, गाढवी, गायमुख, खोब्रागडी, चुलबंद, चोरखमारा, पोटफोडी, फुअर, बोदलकसा, वाघ, बावनथडी, सुर या वैनगंगेच्या उपनद्या आहेत.

महाराष्ट्राचे हवामान :

महाराष्ट्राचे हवामान उष्ण कटिबंधीय मान्सून प्रकारचे आहे. महाराष्ट्र हवामानाचे तीन ऋतूत विभाजन केले जाते. 
   अ) उन्हाळा 
   ब ) पावसाळा 
   क ) हिवाळा 
  • हवामान प्रकार -- उष्ण कटिबंधीय मोसमी 
  • सर्वाधिक पावसाचे ठिकाण --आंबोली ( सिंधुदुर्ग)
  • अवर्षणग्रस्त प्रदेश --सातारा (म्हसवड) , सांगली पूर्व भाग , पुणे अहमदनगर, जिल्ह्यांचा काही भाग 
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाची नोंद-- चंद्रपूर 
  • महाराष्ट्रात सरासरी १२०से.मी. पाऊस पडतो. 
  • सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सर्वाधिक पाऊस पडतो. 
  • वाई, पाचगणी, फलटण, हि शहरे पर्ज्यन्य छायेच्या प्रदेशात येतात. 
  • साधारणतः महाराष्ट्रात १२ जून पर्यंत सर्व ठिकाणी पावसाची सुरवात होते. 

महाराष्ट्रातील मृदा ,प्राणिजीवन  व वनस्पती :

महाराष्ट्रात रेगूर प्रकारची मृदा आढळते . कोकणात जांभई मृदा आढळते. 

महाराष्ट्रातील वने :
   वने                            वनस्पती 
* सदाहरित वने       = जांभूळ ,वेत व बांबू ,फणस,नागपंचा 
* पांनझडी वने          =हिरडा ,साग , साल, वड , मोह, पळस. 
* निमसदाहरित वने  =फणस, आंबा, कदंब, शेवरी. 
* काटेरी व झुडपी वने  = निवडुंग ,  बोर, भाबुळ,आंबेरी. 
* खारफुटी वने              काजळ, समुद्राफल.
  


  

महाराष्ट्रातील  खनिजे :



(1) कोळसा :- खनिज कोळसा हे एक ऊर्जा शक्तीचे महत्वाचे साधन आहे आणि म्हणूनच राष्ट्राच्या विकासात हया खनिजाचा वाटा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील कोळशाचे अंदाजित साठे 5539.07 दशलक्ष टन इतके आहेत. राज्यात कोळशाचे साठे नागपूर, चंद्रपूर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात आढळून आले आहेत. राज्यतील उत्पादनापौकी अधिकांश कोळसा विज निर्मिर्ती, सिमेंट उत्पादन, स्पॉन्ज आयर्न व इतर अनेक उद्योगासाठी वापरण्यात येतो.

(2) मॅगनीज  :- भारतातील महत्त्वाचे मॅगनीजचे साठे महाराष्ट्रात आहेत. या खनिजांचे नागपूर व भंडारा जिल्ह्यात विपुल साठे आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही प्रमाणात आढळून येतात. म्ॉगनिजचा उपयोग फेरोम्ॉगनिज, लोखंड व पोलाद उद्योगात तसेच ब्ॉटरी सेल उद्योगात केला जातो. राज्यातील म्ॉगनिजचे एकूण साठे 20.85 दशलक्षटन इतके आहेत.

(3) लोहखनिज :- राज्यातील महत्त्वाचे लोह खनिजांचे साठे चंद्रपूर, गडचिरोली व सिंधुदूर्ग जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात लोह खनिजाचे अंदाजित साठे 360 दशलक्ष टन आहेत. लोह खनिजाचा उपयोग स्टील व स्पॉन्ज आयर्न उद्योगात कला जातो.

(4) चुनखडक :- चुनखडकाचे विपुल साठे राज्याच्या चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांत आढळतात. उच्च प्रतीच्या चुनखडकांच्या साठयाव्यतिरिक्त राज्यात बज्याच ठिकाणी कमी प्रतीचे चुनखडकाचे साठे आढळतात. राज्यात चुनखडकाचे अंदाजित साठे साठे 1,310 दशलक्षटन इतके आहेत. चुनखडकाचा उपयोग प्रामुख्याने सिमेंट तयार करण्याकरिता, लोह व पोलाद प्रकल्पात अकभवाह म्हणून तसेच इतर अनेक उद्योगात करण्यात येतो.

(5) डोलोमाईट :- डोलोमाईटचे साठे चंद्रपूर, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात आढळतात. डोलोमाईट अभिवाह म्हणून लोखंड व पोलाद उद्योगांत, कोळसा खाणीत भुकटी म्हणून तसेच शोभिवंत दगड म्हणून उपयोगात आणतात. डोलोमाईटचे महाराष्ट्रातील अंदाजित साठे 61.30 दशलक्षटन आहेत.

(6) कायनाईट-सिलीमनाईट :- राज्यातील कायनाईट व सिलीमनाईटचे साठे फक्त भंडारा जिल्ह्यात आढळतात. या खनिजांचा उपयोग धातुशास्त्रीय उद्योग, सिमेंट निर्मिती, काच निर्मिती इत्यादी उद्योगांमध्ये लागणाज्या उच्च प्रतीच्या उष्णता रोधक विटा तयार करण्याकरिता होतो. या खनिजांचे अंदाजित साठे 2.61 दशलक्षटन आहेत.

(7) बॉक्साईट :-  प्रामुख्याने बॉक्साईट या खनिजापासून अॅल्युमिनियम धातूची निर्मिती होते आणि सिमेंट उद्योगातही याचा वापर करण्यात येतो. हे खनिज कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे व सातारा जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावरील थरात आढळते. सदर कखनजांचे महाराष्ट्रतील अंदाजित साठे 112.951 दशलक्ष टन आहेत.

(8) सिलीका वाळू :- सिलीका वाळूचे साठे मुख्यत्चेकरून राज्यातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात आढळतात. सिलीका वाळू ही ओतकामासाठी तसेच काचनिर्मितीसाठी वापरली जाते. सिलीका वाळूचे अंदाजित साठे 85.207 दशलक्ष टन आहेत.

(9) क्रोमाईट :- क्रोमाईट या खनिजाचा उपयोग मुख्यत्वेकरून धातुशास्त्रीय उद्योग, उष्णतारोधक वस्तु व रासायनिक उद्योगात केला जातो. या खनिजाचे साठे नागपूर, भंडारा, सिंधुदूर्ग व चंद्रपूर जिल्ह्यांत आढळतात. या खनिजांचे अंदाजित साठे 0.659 दशलक्ष टन आहेत.

(10) बेराईट :- हे खनिज चंद्रपूर जिल्ह्यांत आढळून येते. खनिजांचे अंदाजित साठे 0.1365 दशलक्ष टन आहेत. या खनिजाचा उपयोग मुख्यत्वेकरून तेल विहीरीच्या खोदकामात आणि पेंट उद्योगात केला जातो.

(11) तांबे :-  नागपूर जिल्ह्यात तांबे हे खनिज पुलार, तांबेखाणी, कोलारी, इत्यादी ठिकाणी तसेच चंद्रपूर जिल्ह्यात अल्प प्रमाणात आढळून येते. खनिजांचे अंदाजित साठे 7.708 दशलक्ष टन आहेत.

(12) जस्त :- जस्तयुक्त खनिजे नागपूर जिल्ह्यातील तांबेखाणी, कोलारी, भवरी इत्यादी गावाचे परिसरात आढळून येत असून क्षेत्रात सुमारे 8.27 दशलक्षटन खनिज साठे अंदाजित करण्यात आले आहेत. जस्त या खनिजाचा उपयोग ग्ॉलव्हनायजिंग, ब्ॉटरी, अलॉय, रसायने, संरक्षण इत्यादी उद्योग क्षेत्रात करण्यात येते.

(13) टंगस्टन :- टंगस्टन खनिज नागपूर जिल्ह्यात आगरगाव, कुही, खोबना इत्यादी क्षेत्रात आढळून येत असून 19.98 दशलक्ष टन वुल्फ्रामाईट या टंगस्टनयुक्त खनिजाचे साठे अंदाजित करण्यात आले आहेत.

(14) फ्लोराईट :- फ्लोराईट खनिज चंद्रपूर जिल्ह्यात डोंगरगाव इत्यादी क्षेत्रात आढळून येत असून 0.1. दशलक्षटन साठे अंदाजित आहेत.



राज्यातील राष्ट्रीय उद्याने:


    राष्ट्रीय उद्यान                         ठिकाण 

* संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली व ठाणे
* पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर
* नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया
* ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर
* गुगामल राष्ट्रीय उद्यान (मेळघाट) अमरावती
* चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा,कोल्हापूर, रत्नागिरी


·        



महाराष्ट्रात असलेले अभयारण्य


          अभयारण्य                       जिल्हा



*         नर्नाळा--------------------------अकोला

*  जायकवाडी ---------------औरंगाबाद, अहमदनगर
*·        अंधारी-----------------------चंद्रपुर
*·        बोर---------------------------वर्धा

* कोयना अभयारण्य----------------------------सातारा*·         टिपेश्वर---------------------यवतमाळ
*         नागझिरा----------------------भंडारा
*·         भामरागड--------------------गडचिरोली
*·         चपराळ-----------------------गडचिरोली
*·         मेळघाट-----------------------अमरावती
*·         नर्नाळा--------------------------अकोला
*·         वान---------------------------अमरावती
*·         अंबाबरवा----------------------बुलढाणा
*·         नांदूर मध्यमेश्वर---------------नाशिक
*·         यावल----------------------------जळगाव
*·         कळशुबाई हरिश्चंद्र गड--------अहमदनगर
*·         गौताळा औटरमघाट------------औरंगाबाद, जळगाव
*·         जायकवाडी पक्षी अभयारण्य---------------औरंगाबाद, अहमदनगर
*·         नायगव मयूर अभयारण्य------------------बीड
*·         येडसी रामलिंगघाट---------------------उस्मानाबाद
*·         अनेर डॅम-----------------------------------धुळे
*·         काटेपूर्णा---------------------------------अकोला, वाशिम
*·         पैनगंगा--------------------------------------यवतमाळ
*·         ज्ञानगंगा--------------------------------------बुलढाणा
*·         कारंजा-सोहळ----------------------------------अकोला
*·         लोणार अभयारण्य----------------------------बुलढाणा
*·         कर्नाळा पक्षी अभयारण्य---------------------ठाणे
*·         तानसा---------------------------------------ठाणे
*·         फनसाड--------------------------------------रायगड
*·         भीमाशंकर-----------------------------------पुणे
*·         माळढोक अभयारण्य----------------पुणे, सोलापूर, अहमदनगर
*·         रेहकुरी अभयारण्य-------------------------अहमदनगर
*·         मयूरेश्वर-सुपे-----------------------------------पुणे
*·         राधानगरी अभयारण्य-----------------------कोल्हापूर
*·         सागरेश्वर अभयारण्य-------------------------सांगली
*·         कोयना अभयारण्य----------------------------सातारा
*·         चांदोली अभयारण्य------------------सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी
*·         मालवण सागरी अभयारण्य-------------------सिंधुदुर्ग
*·         तुंगारेश्वर अभयारण्य-------------------------ठाणे





महाराष्ट्रातील व्याघ्र  प्रकल्प :

महाराष्ट्रात एकूण ६ व्याघ्र प्रकल्प आहेत. २०११ च्या अहवालानुसार राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने महाराष्ट्रातील वाघांची अंदाजित संख्या १६० ते १९६ दरम्यान असून सरासरीने ती १६९ असल्याचे दर्शविले आहे.

 १ )मेळघाट -अमरावती  

२) ताडोबा अंधारी प्रकल्प - चन्द्र्पूर

 ३) पेंच प्रकल्प - नागपूर 





 ४) सह्यान्द्री - पुणे, सातारा, सांगली,
 ५) बोर -वर्धा व नागपूर
 ६) नवेगाव-नागझिरा --गोंदिया




.

महाराष्ट्राची   लोकसंख्या:


* एकूण लोकसंख्या : ११ कोटी २३ लाख ७२ हजार ९७२  
* पुरुषांची संख्या : ५ कोटी ८३ लाख ६१ हजार ३९७   * स्त्रियांची संख्या : ५ कोटी ४० लाख ११ हजार ५७५ * दशकातील लोकसंख्यावाढीची टक्केवारी : १५.९९ %       

* स्त्री-पुरुष प्रमाण : हजार पुरुषांमागे ९२५ स्त्रिया  

* लोकसंख्येची घनता : प्रती चौ. कि. मि. ३६५ व्यक्ती 


महाराष्ट्राची  साक्षरता:


* एकूण साक्षरता : ८२.९१ %


* पुरुषांमधील साक्षरता : ८९.८२ %
* स्त्रियांमधील साक्षरता : ७५.७८ % * ग्रामीण भागातील साक्षरता : ७७.०९ %* नागरी भागातील साक्षरता : ८९.८४ %


* राज्यातील सर्वाधिक साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगरे (९०.९ %)* राज्यातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार(६३.०४ %)

      इ] महाराष्ट्रातील प्रमुख घाट :  

      घाटाचे नाव             मार्ग 

 थळ [कसारा] घाट      नाशिक--मुंबई 

 बोरघाट                           पुणे--मुंबई 

 माळशेज घाट                 कल्याण--नगर

 नाणेघाट                        मुंबई--अहमदनगर  

आंबोली घाट                   सावंतवाडी--- बेळगाव 

 वरंधा घाट                       महाड--भोर

 आंबा घाट                  कोल्हापूर- रत्नागिरी 

 फोंडा घाट                     कोल्हापूर--पणजी

 दिवा घाट                        पुणे--बारामती 

 खंबाटकी घाट                 पुणे---सातारा 

 पसरणी घाट                   वाई--- महाबळेश्वर 

 आंबेनळी घाट                   महाड--भोर 


] महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणे: 

 ठिकाण                            जिल्हा 

 लोणावळा                            पुणे

 पाचगणी                          सातारा

 पाल                               जळगाव 

 पन्हाळा                         कोल्हापूर

 म्हैसमाळ                    औरंगाबाद 

 खंडाळा                          पुणे

 भंडारदरा                अहमदनगर  

आंबोली                      सिंधुदुर्ग

 चिखलदरा               अमरावती

 माथेरान                      रायगड 

 महाराष्ट्रातील महत्वाचे किल्ले :  

जिल्हा                                                किल्ले

 पुणे                             तोरणा ,पुरंदर,राजगड,शिवनेरी,सिंहगड,लोहगड

पालघर                      अर्नाळा,तारापूर,काळदुर्ग,शिरगाव,वसई भुईकोट 

ठाणे                                      माहुली,गोरखगड,पळसगड 

 रत्नागिरी                    जयगड,रत्नदुर्ग,बाणकोट,विजयगड

रायगड                      कर्नाळा,रायगड,जंजिरा,सुधागड,खांदेरी,उंदेरी

नाशिक           मांगी-तुंगी,अंकाई-टंकाई,सळर-मुल्हेर,मदनगड-बिडांगड

 सातारा                                 प्रतापगड,अजिंक्यतारा,सज्जनगड,मकरंदगड 

सांगली                      भूपालगड,मिरज भुईकोट किल्ला,गणेशदुर्ग 

 अकोला                         नर्नाळा ,बाळापूर,

 नागपूर                           सीताबर्डी

 कोल्हापूर                     पन्हाळगड,विशाळगड,गगनगड,भुदरगड

 उस्मानाबाद                   नळदुर्ग, परांडा औरंगाबाद देवगिरी 


  महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या   :

लेण्या                           ठिकाण/जिल्हा 

*  अजिंठा, वेरुळ           - औरंगाबाद 

एलिफंटा, घारापुरी -       रायगड 

*  कार्ला, भाजे, मळवली -      पुणे

*  पांडवलेणी -                   नाशिक 

*  बेडसा, कामशेत -             पुणे 

*  पितळखोरा                 औरंगाबाद

*   खारोसा-                       लातुर  

* धाराशीव (जैर)          उस्मानाबाद 

महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणे: 

    1.  मुख्य शहरे
    2. मुंबई - मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबईत व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने भारताच्या विविध भागांतून लोक रोजगारासाठी येथे मोठ्या संख्येने येतात.
    3. पुणे - शिवाजीपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. शिक्षण आणि संशोधनसंस्था येथे मोठ्या संख्येने आहेत. पुणे शहर परिसरात आधुनिक उद्योगव्यवसाय मोठ्या संख्येने उभे राहिले आहेत. विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतातील आघाडीचे शहर असा लौकिक पुण्याने मिळवला आहे.
    4. नागपूर – विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर असलेले नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते.
    5. औरंगाबाद - महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असा लौकिक असलेल्या या शहरात आणि परिसरात अनेक जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येथे आहे. वाहनांचे सुटे भाग आणि पेयनिर्मितीच्या कारखान्यांची संख्या औरंगाबाद परिसरात मोठी आहे. मराठवाडा विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.
    6. नाशिक - हे उत्तर महाराष्ट्रातील ऐतिहासिक व औद्योगिक शहर आहे. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या मुहूर्तावर गोदावरी नदीत स्नान करणे पवित्र मानले जाते. त्यासाठी हिंदू साधू आणि भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. 
    7. कोल्हापूर- शिवाजीच्या काळापासून व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर अंबाबाईच्या महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.त्याच बरोबर येथे शिवाजी विद्यापीठ आहे.
    8. सोलापूर- महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील एक प्रमुख शहर. एके काळी कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. येथील सिद्धेश्वराचे मंदिरही प्रसिद्ध. 
    9. अमरावती- एक प्रमुख शहर. एके काळी कापूस उत्पादनात प्रसिद्ध होते. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे गांव. आधुनिक संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जिल्हा म्हणुन ओळख
    10. सातारा- मराठी साम्राजाची राजधानी म्हणून प्रसिध्द असणारे शहर. या शहरात इतिहासाच्या पाऊल खुना प्रखरतेने जानवतात. शुरविरांचा जिल्हा म्हणुन ओळख. ०
    11. भंडारा – या जिल्ह्य़ात आढळणारे मँगनिजचे साठे हे गोंडाइट मालेच्या खडकाशी निगडित असून ते प्रामुख्याने तुमसर तालुक्यात आढळतात. ० 
    12. नागपुर – या जिल्ह्य़ात मँगनिज हे सावनेर तालुक्यात खापा या गावापासुन पूर्वेस रामटेक तालुक्यातून भंडारा जिल्ह्य़ातील भंडारा तालुक्यापर्यंत आढळतात. हा पट्टा पुढे मध्य प्रदेशात जातो. नागपूर जिल्ह्य़ात कांदी, मनसळ, रामडोंगरी, कोदेगाव, खापा या भागांत मँगनिजचे साठे आढळतात. ० 
    13. सिंधुदुर्ग – या जिल्हय़ात सावंतवाडी व वेंगुर्ला या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मँगनिजचे साठे आढळतात. याशिवाय कणकवली तालुक्यातही मँगनिजचे साठे आढळतात. लोहखनिज भारतातील एकूण लोहखनिजांच्या साठय़ांपकी २० टक्के लोहखनिजाचे साठे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात लोहखनिजाचे साठे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांत आढळतात. पूर्व विदर्भात जलजन्य खडकात लोहखनिज आढळतात. यातील गडचिरोली जिल्ह्य़ात सुरजागड लोहखनिजाचे साठे चांगल्या प्रतीचे आहेत. ०
    14. चंद्रपूर – चिमुर तालुक्यात िपपळगाव, भिसी, तसेच ब्रह्मपुरी तालुक्यात रत्नापूर व लोहारडोंगरी येथे लोहखनिजाच्या खाणी आहेत. ०
    15. गडचिरोली – गडचिरोली व देऊळगाव परिसर हा लोहखनिजासाठी प्रसिद्ध आहे. येथे उच्च प्रतीची लोहखनिजे आढळतात. ० 
    16. गोंदिया – गोरेगाव तालुक्यात मॅग्नेटाइट प्रकारचे लोहखनिज आढळते. गोंदिया जिल्ह्य़ात अग्निजन्य खडकात लोहखनिज आढळते. ० 
    17. सिंधुदुर्ग – या जिल्हय़ात वेंगुर्ला तालुक्यात रेडी, आसोली येथे तर सावंतवाडी तालुक्यात काही ठिकाणी लोहखनिजाचे साठे आढळतात. रेडीनजीक टेकडय़ांत दोन किमी लांबीपर्यंत लोहखनिजाचे साठे आहेत. ०
    18. कोल्हापुर – या जिल्ह्य़ात शाहुवाडी व राधानगरी तालुक्यात लोहखनिजाचे साठे आढळतात. बॉक्साइट याचा उपयोग प्रामुख्याने अ‍ॅल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. भारतातील सुमारे २१ % बॉक्साइटचे उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील बॉक्साइटचे साठे उच्च प्रतीचे आहेत, ते कोल्हापुर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, सातारा व सांगली या जिल्ह्य़ांत आढळतात. ०
    19. कोल्हापूर – या जिल्ह्य़ात शाहुवाडी, राधानगरी व चंदनगड तालुक्यात बॉक्साइटचे साठे आढळतात. येथील बॉक्साइटचा उपयोग इंडियन अ‍ॅल्युमिनियम कंपनीच्या बेळगाव येथे अ‍ॅल्युमिनियम कारखान्यात धातू निर्मितीसाठी उपयोगात आणले जाते. ० 
    20. रायगड – या जिल्ह्य़ात बॉक्साइटचे साठे प्रामुख्याने मुरुड, रोहा व श्रीवर्धन या तालुक्यांत केंद्रित आहेत. ०
    21. ठाणे – या जिल्ह्य़ात सालसेट बेट व तुगार टेकडय़ांच्या प्रदेशात बॉक्साइटचे साठे आहेत. येथील साठे कनिष्ठ प्रकारचे आहेत. या क्षेत्रांच्या व्यतिरिक्त मुंबई उपनगर (बोरिवली, जोगेश्वरी, गोरेगाव), सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आंबोली घाटाच्या प्रदेशात तसेच रत्नागिरी जिल्ह्य़ात (दापोली व मंडणगड तालुक्यात) बॉक्साइटचे साठे आढळतात. बॉक्साइटचे साठे हे मुख्यत: जांभ्या खडकात आढळतात. चुनखडी बांधकामात जोडण्यासाठी लागणारा चुना हा चुनखडकापासुन तयार केला जातो. महाराष्ट्रात चुनखडीचे फक्त दोन टक्के साठे आहेत. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्य़ात आढळतात. ० 
    22.  यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्य़ात चुनखडीचे सर्वात जास्त साठे आढळतात. याशिवाय धुळे, नंदुरबार, नांदेड, इ. ठिकाणीही चुनखडीचे साठे आढळतात. मात्र हे साठे कनिष्ठ दर्जाचे आहेत. ०
    चंद्रपूर – या जिल्ह्य़ात बरोडा व नाजोरा तालुक्यात चुनखडीचे साठे आढळतात. डोलोमाइट याचा उपयोग प्रामुख्याने लोहपोलाद निर्मितीसाठी तसेच खत कारखान्यात केला जातो. डोलोमाइट व डोलोमाइटयुक्त चुनखडीचे साठे प्रामुख्याने यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्य़ांत आढळतात. याशिवाय रत्नागिरी व नागपूर जिल्ह्य़ांतही थोडे साठे आढळतात. भारतातील डोलोमाइटच्या एकूण साठय़ांपकी एक टक्का साठा महाराष्ट्रात आढळतो. कायनाइट व सिलीमनाइट हिऱ्यांना पलू पाडण्याच्या उद्योगात तसेच काचकाम रसायन उद्योग, सिंमेट उद्योग, इ. ठिकाणी कायनाइटचा उपयोग होतो. महाराष्ट्रात भंडारा व गोंदिया जिल्ह्य़ात कायनाइटचे साठे आढळतात. मीठ महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत विशेषत: रायगड, ठाणे, मुंबईलगतच्या भागात मीठ तयार केले जाते. मिठाचा उपयोग खाण्याव्यतिरिक्त रासायनिक उद्योगातही केला जातो.


     महाराष्ट्रातील प्रसिद्ध संतांची समाधी स्थळे 

    संत                                  समाधी स्थळ 

    *  गाडगे महाराज           अमरावती

    *  रामदासस्वामी           सज्जनगड

    *  एकनाथ                       पैठण

    *  गजानन महाराज         शेगाव

    * द्यानेश्वरी                  आळंदी

     * गोरोबा कुंभार        ढोकी 

    *  चोखा मेळ              पंढरपूर

    * मचिन्द्रनाथ         सप्तशृंगी 

    * तुकडोजी महाराज       मोझरी

    *  संत तुकाराम              देहू

    * साईबाबा                   शिर्डी 

    *  जनार्दनस्वामी             दौलताबाद 

    * निवृत्तीनाथ              त्र्यंबककेश्वर

    * दामाजी पंत                 मंगळवेढा

    * श्रीधरस्वामी              पंढरपूर

    * गुरुगोविंदसिंह         नांदेड

    * रामदासस्वामी         जांब

     * संत तुकाराम             देहू 



    महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संबोधने -





    * भारताचे प्रवेशद्वार- मुंबई
    * महाराष्टाची पर्यटन राजधानी--औरंगाबाद
    * अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार --जळगाव
    * भारताची आर्थिक राजधानी – मुंबई.
    * महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर
    * महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार- रायगड
    * मुंबईची परसबाग --नाशिक महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा- रायगड
    * मुंबईची परसबाग – नाशिक
    * महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी
    * मुंबईचा गवळीवाडा- नाशिक
    * मराठवाड्याची राजधानी --औरंगाबाद द्राक्षांचा जिल्हा- नाशिक
    * आदिवासींचा जिल्हा- नंदूरबार
    * महाराष्ट्रातील कापसाचे शेत- जळगाव
    * महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा- यवतमाळ
    * संत्र्याचा जिल्हा- नागपूर
    * महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ- अमरावती
    * जंगलांचा जिल्हा- गडचिरोली
    * महाराष्ट्रातील केळीच्या बागा- जळगाव
    * साखर कारखान्यांचा जिल्हा- अहमदनगर
    * महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार- सोलापूर
    * महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा- कोल्हापूर
    * कुस्तीगिरांचा जिल्हा- कोल्हापूर
    * लेण्यांचा जिल्हा- औरंगाबाद
    * महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर- औरंगाबाद
    * महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा- बीड
    * महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा- उस्मानाबाद
    * महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा- नांदेड
    * देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा- अमरावती.
    * महाराष्ट्रातील दारूबंदीचा जिल्हा--चंद्रपूर





    महाराष्ट्रातील खाडी



    खाडी  - नदी  - जिल्हा
    दातीवरे  - तानसा ,वैतरणा -ठाणे
    वसई   - उल्हास   - ठाणे
    ठाणे -   उल्हास -  ठाणे
    मनोरी  - दहिसर  - मुंबई उपनगर
    मालाड  -         - मुंबई उपनगर
    माहीम  - माहीम  - मुंबई शहर
    पनवेल  -          - रायगड
    धरमतर - पाताळगंगा  - रायगड
    राजपुरी  -    -रायगड
    बाणकोट - सावित्री  - रायगड
    केळशी  - भारजा  - रत्नागिरी
    दाभोळ   - वाशिष्टी  - रत्नागिरी
    जयगड  - शास्त्री  - रत्नागिरी
    भाट्ये  - काजळी  - रत्नागिरी
    पूर्णगड  - मुचकुंदी  - रत्नागिरी
    जैतापूर  - काजवी  - रत्नागिरी
    विजयदुर्ग -  शुक - रत्नागिरी
    देवगड   - देवगड  - सिधुदुर्ग  
    आचरा  - आचरा  - सिंधुदुर्ग
    कालावाली - गड  - सिधुदुर्ग
    कर्ली    - कर्ली  - सिंधुदुर्ग
     





    महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे :

    औष्णिक केंद्र ठिकाण/जिल्हा


    * तुर्भे (ट्रॉम्बे) - मुंबई
    * पारस - अकोला

    * परळीवैजनाथ - बीड
    * एकलहरे - नाशिक
    * कोराडी, खापरखेडा - नागपूर
    * चोला (कल्याण) - ठाणे
    * बल्लारपूर - चंद्रपूर
    * फेकरी (भुसावळ) - जळगाव





    राज्यातील प्रमुख आदिवासी जमाती:

      जमात                       ठिकाण 

    * भिल्ल                -   जळगाव , धुळे, नंदुरबार, नांदेड, सातपुडा पर्वतीय प्रदेश. 
    * महादेव कोळी   -   सह्याद्री रांगा , पुणे,ठाणे, रायगड, नाशिक. 
    * गोंड                  -    चंद्रपूर, गडचिरोली.
    * कोरकू               -   अमरावती 
    * कोकण               - धुळे, नाशिक 
    * वारली                - ठाणे 
    * कोलाम               - सातपुडा पर्वतीय प्रदेश 
    * ठाकर                 - ठाणे, पुणे, नाशिक, अहमदनगर, रायगड 


    राज्यातील महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग 


    महामार्ग क्र.     राष्ट्रीय महामार्ग             अंतर 

           3-             -मुंबई-आग्रा             -391 की.मी.
    ·         4-            -मुंबई-बंगलोर-आग्रा   -371 की.मी.
    ·        4ब            -नाव्हा-शेवा-पळस्पे     -27 की.मी.
    ·        6               -धुळे-कोलकत्ता          -813 की.मी.
    ·        9               -पुणे-विजयवाडा         -336 किमी
    ·        13           - सोलापूर-चित्रदुर्ग-        43 किमी
    ·       16             -निजामाबाद-जगदलपुर- 50किमी
    ·       17            -पनवेल-मंगलोर           -482 किमी  
    ·      50             - पुणे नाशिक               -192 किमी
    ·        69           -नागपुर-अब्दुल्ला गंज  55 किमी
    ·        204         -रत्नागिरी-कोल्हापूर    -126 किमी
    ·        211          सोलापूर-धुळे              400 किमी   




           महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण :

    विद्यापीठ स्थापना ठिकाण/स्थान

    मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई
    पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे
         महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक 
    स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड
    महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) - नागपूर
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
    विद्यापीठ (१९२५)- नागपूर
    कर्मयोगी संत गाडगेबाबा
    विद्यापीठ (१९८३)
    - अमरावती
    उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    मराठवाडा विद्यापीठ (१९५८)
    - औरंगाबाद
    शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर
    यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) - नाशिक\
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान
    विद्यापीठ (१९८९)
    - लोनेर
    कविकुलगुरू कालिदास संस्कृत
    विद्यापीठ (१९९८)
    - रामटेक (नागपूर)


    महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था :


    केंद्र                                               ठिकाण 

    गहू गेरवा संशोधन केंद्र - महाबळेश्वर ( सातारा)
    तेलबिया संशोधन केंद्र - जळगाव
    मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा)

    गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे)
    नारळ संशोधन केंद्र - भाटय़े (रत्नागिरी)
    सुपारी संशोधन केंद्र - श्रीवर्धन (रायगड)
    मोसंबी संशोधन केंद्र - श्रीरामपूर काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
    गूळ संशोधन केंद्र - कोल्हापूर केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव)
    हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली)
    राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, - केगांव (सोलापूर)
    राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)
    तांदूळ संशोधन केंद्र - कर्जत ( रायगड )
    ज्वारी संशोधन केंद्र - मोहोळ ( सातारा )




              महाराष्ट्रातील पर्यटन :



     महाराष्ट्रातील अष्टविनायाके 

    ओझर श्री. विघ्नेश्वर , जि. पुणे
    राजनगांवश्री. महागणपती, जि. पुणे
    लेण्याद्रीगिरिजात्मक, जि. पुणे
    थेऊरचिंतामणी, जि. पुणे
    मोरगांवमोरेश्वर, जि. पुणे
    सिध्दटेकसिध्दिविनायक, जि. अहमदनगर
    पालीबल्लालेश्वर , जि. रायगड
    महाडश्री. विनायक, जि. रायगड 



    र   राज्यातील देवीची साडेतीन शक्तिपीठे 


         देवी                      जिल्हा 

    * महालक्ष्मी               कोल्हापूर 
    * रेणुकामाता             माहूर ( नांदेड ) 
    * तुळजाभवानी            तुळजापूर ( उस्मानाबाद ) 
    * सप्तशृंगी                  वणी ( नाशिक )


    राज्यातील ज्योतिर्लिंगे 

         स्थान                   जिल्हा 

    * त्र्यंब्यकेश्वर          नाशिक 
    * घृष्णेश्वर              औरंगाबाद  
    * भीमाशंकर          पुणे 
    * परळी                  बीड 
    * औंढा -नागनाथ      हिंगोली 

    राज्यातील महत्वाचे धबधबे  

      जिल्हा                   धबधबा 
    * अहमदनगर           रंध्रा 
    * सातारा                ठोसेघर 
    * नांदेड                 सहश्रकुंडे 
    * रत्नागिरी            मार्लेश्वर 
    * बीड                  सैताडा 
    * गडचिरोली         राजीरप्पी 



    1) भीमाशंकर अभयारण्य

    महाराष्ट्राच्या राज्यप्राण्याचे शेकरुचे माहेरघर भीमाशंकर ! घनदाट वनश्रीने नटलेले, धबधब्यांनी सजलेले
    , छोट्या-मोठ्या टेकड्यांनी राखलेल्या अभयारण्याचे भीमाशंकर ! भटकंतीसाठी आसुसलेल्या भटक्यांना
    खुणावणार्‍या वाटांचे भीमाशंकर ! बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे स्थान असलेले सुप्रसिद्ध भीमाशंकर !
    इथल्या घनदाट वनराईचा मोह होऊन महादेव इथे वास्तव्यास आले. गर्द राईतील हे ज्योतिर्लिंगाचे हे देवालय
    इसवी सनाच्या १२ व्या शतकातील असावे असे मानले जाते. पण काळाच्या ओघात देवळाची अनेक वेळा
    डागडुजी झाली त्यामुळे १२व्या शतकातील बांधणीच्या कोणत्याच खुणा आता सापडत नाहीत. चिमाजी
    अंताजी भिडे-नाईक यांनी १७३३ मधे मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे समजते. १७६६मधे दीक्षित पटवर्धनांनी
    मंदिराची काही डागडुजी केल्याचे उल्लेख मिळतात. रघुनाथराव पेशव्यांनी इथली विहीर बांधली. पेशव्यांचे
    थोर मुत्सद्दी नाना फडणवीस यांनी मंदिराच्या शिखराचे बांधकाम केल्याचे उल्लेख मिळतात.
    आपल्याला आत्ता दिसणार्‍या मंदिराचे गर्भगृह आणि शिखर हे 'इंडो आर्यन' पद्धतीचे  किंवा 'नागर' पद्धतीचे दिसते.
    मंदिरावरील कोरीवकामात राजस्थानी आणि गुजराथी आकृत्या व प्रतीके यांचा मोठा प्रभाव दिसतो. रामायण,
    कृष्णलीला, शिवलीला आणि दशावतार यातील अनेक प्रसंग इथे शिल्पांकित केलेले आहेत. देवालयाला मिळालेल्या
    देणग्यांचे उल्लेख परिसरातील शिलालेखांमधे आढळतात. चिमाजी अप्पा पेशव्यांनी जिंकून आणलेली वसईच्या
    किल्ल्यावरील घंटा त्या विजयाची साक्ष देत आजही दिमाखात सभामंडपासमोर टांगलेली आहे.

    2) ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य

    ताडोबा हे भारतातील  एक उत्तम व्याघ्र अभयारण्य आहे. येथे योजलेल्या संरक्षण व संवर्धन उपाययोजनांमुळे
     या जंगलात वाघांची संख्या या प्रकल्पक्षमतेएवढी आता जवळजवळ पूर्ण झाली आहे.
    याचाच अर्थ असा की  ताडोबा व्याघ्र अभयारण्य हे वनस्पती आणि प्राणिसंपदेने आता समृध्द झाले आहे.
    येथे असणाऱ्या वनस्पती व त्या वनस्पतींवर अवलंबून असणारे प्राणी यांचा उत्तम समन्वय येथे झाला आहे.
    मुबलक प्रमाणात झाडांची व प्राण्यांची वाढ झाल्याने वाघ येथे राहू लागला आहे.
    नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने येथे असलेल्या प्राण्यांवर लक्ष ठेवता येते. त्यामुळे जवळपासच्या जंगलात
    व शेजारच्या राज्यातही वाघ व इतर प्राण्यांच्या होणाऱ्या स्थलांतराचा अभ्यास करता येतो.
    तसेच त्यांची अदलाबदलदेखील करता येते. त्यामुळे अत्यंत निरोगी व जीवशास्त्रीय द्रष्ट्या समृध्द
    वनसंपदा व प्राणिसंपदा येथे आहे.


    3) चिखलदरा

    वाघांच्या सान्निध्यात असणारं एक थंड हवेचं ठिकाण ! कसं वाटतं ऐकायला? भीतिदायक की रोमांचकारक?
    खरंतर इथे घाबरण्यासारखं काही नाही, अनुभवण्यासारखं मात्र बरंच आहे. चिखलदरा हे एक थंड हवेचे ठिकाण आहे.
    ते तुम्हाला शांत निसर्गाच्या, पानाफुलांच्या, झाडाझुडपांच्या सान्निध्यात घेऊन जातं. जर तुम्ही जरा वेगळ्या ठिकाणाच्या
    शोधात असाल तर चिखलदरा हे चांगले ठिकाण आहे

    4) लोणावळा – खंडाळा

    मुंबई आणि पुणे येथे राहणाऱ्या नागरिकांना लोणावळा-खंडाळा ही जुळी थंड हवेची ठिकाणे म्हणजे जणू वरदानच वाटतात
    कारण या दोन शहरांचे रहिवाशी अगदी सहज आणि थोड्या वेळात या ठिकाणी पोहचू शकतात. या दोन मेट्रो
    शहरांना विभागणाऱ्या उंच डोंगरमाथ्यावर वसलेली लोणावळा आणि खंडाळा ही स्थाने अत्यंत आल्हाददायक थंड
    हवामान आणि पावसाळ्यामध्ये पांघरणाऱ्या हिरव्यागार गालीच्यांसाठी सुप्रसिद्ध आहेत.
    लोणावळा पुण्यापासून ६४ कि.मी. तर मुंबईपासून ९६ कि.मी. अंतरावर आहे.लोणावळा चिक्की
    आणि ‘फज’ या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरचे लोणावळा हे महत्त्वाचे स्थानक आहे.
    तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग लोणावळ्यातून जात असल्याने  तिथे रस्त्यानेही सहज जाता येते. महाराष्ट्रातील
    इतर थंड हवेच्या ठिकाणांप्रमाणेच लोणावळा येथेही निसर्गातील अनेक सुंदर ठिकाणे आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेली
    लहानशी खेडी, गावे पहायला मिळतात. लोणावळ्यापासून साधारण साडेसहा कि.मी. अंतरावर असलेला एक सुंदर
    ठिकाण म्हणजे राजमाची पॉइंट जेथून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसिद्ध राजमाची किल्ला
    आणि आसमंतातील दऱ्याखोऱ्यांचा विहंगम देखावा पाहता येत



    ५) गणपतीपुळे मंदिर

    शांत, स्वच्छ आणि निर्मळ असा गणपतीपुळ्याचा समुद्र गणेशभक्तांना आणि पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो.
    चमचमणाऱ्या रुपेरी वाळूचा दूरपर्यंत पसरलेला स्वच्छ समुद्रकिनारा,निळ्याशार समुद्राची गाज,अस्सल कोकणी
    बाज जपणारं टुमदार गाव यामुळे पर्यटकांची पावले सुट्टयांमध्ये आपोआपच गणपतीपुळयाकडे वळतात
    .इथे मिळणारे अस्सल,खास कोकणी जेवण आणि कोकणी खाद्यपदार्थ हेही महत्त्वाचं आकर्षण आहेच.
    मुंबईच्या दक्षिणेला साधारण ३७५ कि.मी.अंतरावर कोकण किनारपट्टीवर वसलेलं हे छोटंसं टुमदार गाव.
    इथे समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या गणपतीच्या मंदिरामुळे याचं नाव पडलं गणपतीपुळे. सुमारे ४०० वर्षे जुनं
    असलेलं हे गणेशाचं स्वयंभू स्थान आहे.समुद्रकिनारी असलेल्या, डोंगराच्या पुढे आलेल्या भागाचीच गणपतीच्या
    रुपात पूजा केली जाते. विशेष म्हणजे दररोज सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी श्रीगणेशाची मूर्ती आणि गाभारा
    सोनेरी सूर्यकिरणांनी उजळून निघतो.


    ६) रायगड किल्ला

    रायगडाच्या माथ्यावर उभे राहिले की समोरून येणारा भन्नाट वारा आणि आजूबाजूला असलेली अक्राळविक्राळ खोल
    दरीखोरी तुम्हाला मंत्रमुग्ध तर करतीलच त्याशिवाय तुम्हाला खूप मागे इतिहासात घेऊन जातील आणि महाराष्ट्राच्या
    लाडक्या शिवाजीराजाचा जीवनपट तुमच्यासमोर उभा करतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच
    रायगड किल्ल्यावर ६ जून १६७४ साली झाला. आणि महाराष्ट्राच्या या थोर राजाने आपला शेवटचा श्वास देखील
    याच किल्ल्यावर घेतला. रायगड हे पर्यटकांचे लाडके ठिकाण तर आहेच, परंतु हा किल्ला आपल्या दुर्गमतेमुळे
    गिर्यारोहकांचे देखील आकर्षण ठरलेला आहे.
    समुद्रसपाटीपासून ८२० मीटर उंच असलेला रायगड महाड तालुक्यामध्ये वसलेला आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य
    म्हणजे वेगवेगळ्या कालखंडात या किल्ल्याला निरनिराळी नावे मिळाली. तणस, रासिवटा, नंदादीप, रायरी ही त्यापैकी
    काही नावे होत


    ७) सिंधुदुर्ग किल्ला

    मराठा साम्राज्याचे शासक किती दूरदृष्टीचे, राज्यनिपुण, महत्त्वाकांक्षी आणि संपन्न होते हे जर आपणाला पहायचे
    असेल तर महाराष्ट्राच्या कोंकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्यायलाच हवी. मालवणपासून समुद्रात २ किलोमीटरवर
    असलेल्या एका खडकाळ बेटावर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. याच्या आजूबाजूला समुद्रात
    इतस्ततः विखुरलेल्या खडकांमुळे या किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे. या किल्ल्याचे रांगडे सौंदर्य
    आणि याचे ऐतिहासिक महत्त्व ह्या गोष्टी तर आहेतच परंतु इथून दिसणारा निसर्गरम्य आसमंत आणि साहसी
    खेळांचे विविध पर्याय हे सुद्धा पर्यटकांना इथे आकर्षित करतात.
    मालवण तालुक्यामधील सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे सागरी किल्ल्यांमधील एक सर्वांगसुंदर किल्ला म्हणावा लागेल.
    याचे बांधकाम इ.स.१६६४ मध्ये सुरु होऊन १६६७ मध्ये पूर्ण झाले.



    ८) पन्हाळा किल्ला


    महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे स्थान असणारा पन्हाळा,थंड हवेचे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय आहे .
    इ.स.१२व्या शतकात कोल्हापूर इथे राज्य करणाऱ्या शिलाहार राजांनी या किल्ल्याची उभारणी केली.त्यानंतर
    देवगिरीचे यादव, बहामनी, आदिलशाही आणि अखेरीस मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला आला.
    इ.स.च्या १७व्या शतकापासून ते १८व्या शतकापर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या अधिपत्याखाली राहिला.
    छत्रपती शिवाजीमहाराजांनी या किल्ल्यावर बराच काळ व्यतीत केला होता. महाराणी ताराराणी यांनी करवीर
    किंवा कोल्हापूर संस्थानाच्या पन्हाळा गादीची स्थापना केली.
    कोल्हापूरपासून 20 कि.मी. वर असणारा हा दुर्ग अनेक राजकीय घडामोडी आणि युद्धांचा साक्षीदार आहे.
    कोकण व उर्वरित महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील खिंडीचा नयनरम्य देखावा पन्हाळा येथून फारच छान दिसतो.
    किल्ल्यावर वास्तूंचे अनेक अवशेष असून त्यांची देखभाल भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत केली जाते. किल्ल्याला वर्षभर
    कधीही भेट देऊ शकतो पण पावसामुळे खुलणारी दाट हिरवाई आणि दाट धुक्यामुळे निर्माण होणारे गूढ,
    रोमांचक वातावरण अनुभवण्यासाठी पावसाळ्यात नक्कीच भेट द्यायला हवी. पन्हाळा येथे अनेक हॉटेल्स आहेत.
    तेथे अस्सल कोल्हापुरी जेवणाची उत्तम सोय होऊ शकते.





    ९) जंजिरा

    महाराष्ट्रातल्या विविध राजवटींचे एक मोठे योगदान म्हणजे त्यांनी नेमक्या मोक्याच्या आणि दुर्गम जागी बांधलेले किल्ले हे होय. या किल्ल्यांपर्यंत पोचणे अगदी दुरापास्त होते. ज्याप्रमाणे डोंगरी भागात अवघड जागी किल्ले
    आढळतात, तसाच राजपुरी खाडीच्या मुखाशी समुद्रामधील खडकाळ बेटावर बांधलेला हा दुर्गम जलदुर्ग जंजिरा.
    नेमक्या मोक्याच्या जागी बांधलेला असल्यामुळे हा किल्ला कोणाही तत्कालीन राजवटींना जिंकता आलेला नाही.
    मुरुड या किनाऱ्यावरील गावापासून समुद्रात ३ कि.मी वर बांधलेला हा जलदुर्ग जंजिरा म्हणजे बांधकाम
    स्थापत्याचा एक अजोड नमुना आहे. समुद्राच्या लाटा रात्रंदिवस सतत या किल्ल्याला सर्वबाजूंनी धडका
    देत असूनही या किल्ल्याची ४० फूट उंचीची बेलाग तटबंदी आजही या माऱ्याला तोंड देत ताठ मानेनं उभी आहे.
    एकूण २२ एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या या किल्ल्याला १९ बुरुज असून प्रत्येक बुरुजावर एकेक तोफ
    ठेवलेली आढळते. यातील काही तोफा तर आजसुद्धा चांगल्या स्थितीत आहेत.


    १०) प्रतापगड

    मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवाची साक्ष असणार्‍या ३६० किल्ल्यांपैकी प्रतापगडाचे
    स्थान फार महत्त्वाचे आहे. विजापूरच्या आदिलशहाचा पराक्रमी सरदार अफझलखान याचा त्यांनी प्रतापगडावर
    केलेला वध हा त्यांच्या व मराठ्यांच्या इतिहासातील निर्णायक क्षण ठरला. या किल्ल्यावरून जावळीचा निसर्गरम्य
    परिसर फारच रमणीय दिसतो.
    पर्वतरांगांनी व खोल दर्‍यांनी वेढलेला प्रतापगड महाबळेश्वर ह्या थंड हवेच्या ठिकाणाजवळ आहे. १० नोव्हेंबर १६५९
    रोजी झालेल्या शिवाजी महाराज व अफझलखान यांच्या भेटीमुळे तो इतिहासात नोंदला गेला.

    ११) अजिंठा लेणी

    महाराष्ट्र राज्य त्यामध्ये मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कोरीव गुंफा अथवा लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे ८०० लेणी पसरली आहेत. यापैकी अजिंठा येथील गुंफा जागतिक वारसा स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहेत. येथील स्थापत्यशैली, बौद्ध परंपरा आणि चैत्यगृहे आणि विहारांच्या भिंतींवर रंगविण्यात आलेल्या श्रेष्ठ चित्रकृतींमुळे जगभरातून शेकडोंच्या संख्येने पर्यटक या ठिकाणास भेट देतात. भारत सरकारच्या पुरातत्त्वखात्याने वर्णन केल्याप्रमाणे “प्राचीन भारतीय कलेचा, विशेषतः चित्रकलेचा, उपलब्ध असणारा सर्वोत्कृष्ट नमुना” म्हणजे अजिंठा येथील चित्रे व शिल्पे होत. यामधून आपणास बुद्धमूर्ती आणि जातक कथांचे चित्रण याद्वारे प्रातिनिधिक स्वरूपात बौद्ध धार्मिक कलेचे दर्शन घडते.

    १२) एलिफंटा लेणी


    गेट वे ऑफ इंडिया मुंबईतील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ. या ठिकाणचे दुसरे आकर्षण म्हणजे अरबी समुद्राचा नौकाप्रवास - एक विलक्षण अनुभव. या अनुभवाच्या सुखद लहरी यावरच थांबत नाहीत, तर मुंबईपासून केवळ १० कि.मी. अंतरावर असणाऱ्या एलिफंटा द्वीपाची सफर ही आणखी एक पर्वणी. हे द्वीप म्हणजे ताड, आंबा आणि चिंच यांची बने जणू निसर्गाने मुक्तहस्ताने दिलेली देणगी आणि दगडात कोरलेल्या प्राचीन गुहा ज्यांना आता जागतिक वारसा स्थानात गणले गेले आहे, यांचा संगम आहे.

    १३) श्रीवर्धन

    श्रीवर्धन रोठा नावाने प्रसिद्ध असलेल्या सुपारीचे गाव अशी ओळख असलेले श्रीवर्धन हे मराठी साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या पेशव्यांचे मूळ गाव म्हणूनही प्रसिद्ध आहे. या गावात जवळजवळ प्रत्येक घराला एक वाडी म्हणजेच सुपारीची बाग आहे, आणि या प्रत्येक वाडीमध्ये लावलेल्या सुपारीच्या झाडांच्या फांद्याची जणू कमानच रस्त्यावर आपले स्वागत करते. या सुपारीच्या वाड्यांमुळे वातावरण अगदी रम्य आणि उत्साहपूर्ण झालेले असते. श्रीवर्धनला येणारा रस्ता हा सुंदर वळणावळणाचा असून त्या रस्त्यावर खूप जुन्या आणि मोठ्या वटवृक्षांच्या फांद्यांनी छान कमानी केलेल्या आहेत. त्यामुळे हा प्रवास अत्यंत रमणीय तर होतोच पण प्रवासाचा थकवा अजिबात जाणवत नाही.


    १४) हरिहरेश्वर

    नैसर्गिक सौंदर्य आणि आध्‍यात्‍मिक अनुभूतीचा सुरेख संगम म्‍हणजे 'दक्षिण काशी' या नावाने ओळखले जाणारे 'हरिहरेश्‍वर'. महादेवाच्‍या वास्‍तव्‍याने पवित्र झालेले हे स्‍वर्गीय ठिकाण मुंबईपासून अंदाजे 200 कि.मी. अंतरावर आहे. कोकणातल्‍या या निसर्गरम्‍य गावाला अतिशय रम्‍य असा समुद्रकिनाराही लाभला आहे.
    महाबळेश्‍वर येथे उगम पावणारी पवित्र सावित्री नदी हरिहरेश्‍वर येथे अरबी समुद्राला येऊन मिळते. रायगड आणि रत्‍नागिरी जिल्‍ह्याच्‍या मधून ही नदी वाहते. नदीच्‍या उत्‍तर किनाऱ्यावर हरिहरेश्‍वर वसले आहे तर दक्षिण किनाऱ्यावर रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील बाणकोट. इथे हिंमतगड नावाचा किल्‍ला असून तिथे जाण्‍यासाठी फेरी बोटीची व्‍यवस्‍था होते.













    महत्वाचे दिनविशेष

    <सामान्य ज्ञान महत्वाचे दिनविशेष   १) जागतिक दिनविशेष #    जानेवारी  * १ जाने --जागतिक धूम्रपान दिन *१० जान...